शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उद्योगांनी पाण्याच्या पुन:वापरावर भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:30 IST

उद्योगांनी प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा वापरावे, प्रक्रिया केलेले पाणी कमी पडले तर फ्रेश पाणी वापरता येईल. यापुढे उद्योगांना पाण्याच्या पुन:वापरावर भर द्यावा. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी औरंगाबादेत सांगितले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : धरणाचे पाणी शेती व पिण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उद्योगांनी प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा वापरावे, प्रक्रिया केलेले पाणी कमी पडले तर फ्रेश पाणी वापरता येईल. यापुढे उद्योगांना पाण्याच्या पुन:वापरावर भर द्यावा. धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी वापरले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी औरंगाबादेत सांगितले.शेंद्रा-बिडकीन या डीएमआयसी प्रकल्पातील आॅरिक टप्पा क्रमांक-२ च्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते आले होते. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या महिन्यात वैजापूर येथे धरणातील पाणी उद्योगांना देणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते.त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, उद्योगांना पाणी देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याच्या पुन:वापरासाठी नागपूरला मॉडेल तयार केले.नवी मुंबईतही प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाते. प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांनी वापरल्यामुळे एमआयडीसी व मनपालादेखील त्याचा फायदा होतो आहे. उद्योगांकडून वाचलेले पाणी शेती व पिण्यासाठी देता येते. एमएमआरडीएला पाणी कमी पडते आहे. तेथील पाणी उद्योगांना दिले तर त्या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. नवी मुंबईत पाण्याचा पुन:वापर होतो आहे.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय उद्योगमंत्री तथा नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, आ.इम्तियाज जलील, आ.नारायण कुचे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी आदींची उपस्थिती होती.आठ दिवसांत मनपा, पोलीस आयुक्त देणारडीएमआयसी, आॅरिक पुढे नेण्यासोबत औरंगाबाद मागे पडते आहे काय, यावर मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबाद मनपाला रस्त्यांसाठी आजपर्यंत कुठल्याही शासनाने दिला नाही, एवढा निधी आम्ही दिला. कचरा व्यवस्थापनासाठी मनपाला निधी देण्यास सुरुवात केली आहे. असे असताना काही लोक आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. शहराला मनपा, पोलीस आयुक्त नाहीत. यावर ते म्हणाले, जिल्हाधिकारी रुजू झाले आहेत. मनपा आयुक्त आठ दिवसांत रुजू होतील. पोलीस आयुक्तांची नियुक्तीही आठ दिवसांत होईल.