शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी उद्योग ठप्प; उत्पादनात २५ टक्क्यांची घट, कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:09 IST

उद्योजकांचा महावितरणविरुद्ध संताप

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. विजेअभावी दुसऱ्या पाळीतील कामगारांना हातावर हात ठेवून बसावे लागले, तर तिसऱ्या पाळीतील उत्पादन पूर्णतः ठप्प झाले. यामुळे सुमारे २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. दरम्यान, हे नुकसान कसे भरून काढायचे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. एवढेच नव्हे तर दर शुक्रवारी दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. असे असताना पावसाच्या सरी कोसळताच वीजपुरवठा खंडित होतो, हा अनुभव शहरवासीय आणि उद्योगजगत घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी पावसात वीज यंत्रणा कोलमडून पडली. चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्येही रोज किमान ४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात आता नवीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम येथील उद्योगनगरी करीत आहे. मात्र, महावितरणचा कारभार त्या दर्जाचा नाही, या शब्दात पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, तर ‘मसिआ’चे माजी अध्यक्ष चेतन राऊत यांनी पाऊस अथवा वादळ येताच वीज खंडित होते. त्यामुळे वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, असे सांगितले.

वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरूमान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे महावितरणने न केल्यामुळे गुरुवारी वाळूज येथे वीजपुरवठा खंडित झाला. आमच्या दुसऱ्या शिफ्टला कामावर आलेल्या कामगारांना बसून राहावे लागते, तर तिसऱ्या शिफ्टचे काम करताच आले नाही. एमआयडीसीतील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला. यात उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.- अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.

वेळेत ऑर्डर देता येत नाहीमहावितरणच्या गलथान कारभारामुळे उद्योग जगताला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे हा उद्योजकांचा हक्क आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे न झाल्याने अनेक झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्या. वीज नसल्याने ग्राहकांकडे ऑर्डर वेळेत पोहोचवता येत नाही.-- दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष, सीएमआयए.

टॅग्स :MIDCएमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीज