शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कचऱ्याच्या नावावर इंदौर ‘टूर’; १३१ दिवस उलटले तरीही मनपाकडून ठोस उपाययोजना नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:12 IST

कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे. 

ठळक मुद्दे शहरातील कचराकोंडीला १३१ दिवस म्हणजेच चार महिने झाले तरी महापालिकेने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला १३१ दिवस म्हणजेच चार महिने झाले तरी महापालिकेने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. आता कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे. 

नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी मांडकी, गोपाळपूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध केल्यापासून म्हणजे १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी आहे. मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून दंगलही झाली. अनेक नागरिक जखमी झाले. कचरा प्रश्नासंदर्भात नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरड केली. एक महापालिका आणि एक पोलीस आयुक्त यांची बदलीही झाली; मात्र कचराकोंडी फोडण्यात मनपा प्रशासनाला अद्याप यश मिळाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी इंदौर शहर पाहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी चीनसह देशभरातील अनेक शहरांमधील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली आहे; मात्र त्याचा महापालिकेला काहीही फायदा झालेला नाही.

इंदौरचे वैशिष्ट्य काय?औरंगाबाद शहर आज जेवढे अस्वच्छ आहे; त्यापेक्षा कितीतरी अधिक इंदौर शहर अस्वच्छ होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत या शहराने गरुडझेप घेतली. अवघ्या एका वर्षात शहराचा कायापालट झाला. स्वच्छ भारत अभियानात मागील वर्षी आणि यंदाही देशात प्रथम येण्याचा मान या शहराने पटकावला. खाजगी अभिकर्त्यामार्फत सकाळ-संध्याकाळ प्रत्येक मालमत्ताधारकाकडून कचरा जमा करण्यात येतो. यासाठी काही ठराविक शुल्कही नागरिकांकडून घेण्यात येते. वॉर्डनिहाय जमा झालेला कचरा नेणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येते.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद