शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

संशोधन केंद्रांसाठी महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे पीएचडी मार्गदर्शकांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:33 IST

यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत.

ठळक मुद्देअवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत.

औरंगाबाद : यापुढे संशोधन केंद्र असल्याशिवाय महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना संशोधनाचे कार्य करता येणार नाही, यूजीसीच्या या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज मागविले होते. मात्र, महाविद्यालयांकडून विद्यापीठाच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

यूजीसीच्या निकषानुसार संलग्नित महाविद्यालयांपैकी अवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्यास विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत. दोन संशोधक मार्गदर्शक, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, दोन संशोधन सहायक कार्यरत असले पाहिजेत, अशीच महाविद्यालये संशोधन केंद्र सुरू करू शकतात. यासाठी यूजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांकडे अर्ज करण्याची महाविद्यालयांना मुदत दिली होती. मात्र, विद्यापीठाने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव घेऊन संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालये वर्षभर कधीही अर्ज करू शकतील, असा अध्यादेश जारी केला. मात्र, महाविद्यालयांकडून अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

संशोधनासाठी विद्यार्थी क्षमतामहाविद्यालयीन संशोधन केंद्रांमध्ये संशोधनासाठी विज्ञान अभ्यासक्रमासाठी १० विद्यार्थी, सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमासाठी २० आणि विद्यापीठातील संशोधन केंद्रामध्ये ५० विद्यार्थी क्षमता निश्चित करण्यात आलेली आहे. संशोधन केंद्र असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कार्यरत मार्गदर्शक शिक्षकांकडेच विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करता येईल, या यूजीसीच्या मार्दर्शक सूचनेनुसार विद्यापीठातील अनेक मार्गदर्शक शिक्षकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, व्यवस्थापन परिषदेने प्रकुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. नुकतीच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात कुलगुरूंसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी