शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

संशोधन केंद्रांसाठी महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे पीएचडी मार्गदर्शकांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:33 IST

यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत.

ठळक मुद्देअवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत.

औरंगाबाद : यापुढे संशोधन केंद्र असल्याशिवाय महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना संशोधनाचे कार्य करता येणार नाही, यूजीसीच्या या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज मागविले होते. मात्र, महाविद्यालयांकडून विद्यापीठाच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

यूजीसीच्या निकषानुसार संलग्नित महाविद्यालयांपैकी अवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्यास विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत. दोन संशोधक मार्गदर्शक, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, दोन संशोधन सहायक कार्यरत असले पाहिजेत, अशीच महाविद्यालये संशोधन केंद्र सुरू करू शकतात. यासाठी यूजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांकडे अर्ज करण्याची महाविद्यालयांना मुदत दिली होती. मात्र, विद्यापीठाने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव घेऊन संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालये वर्षभर कधीही अर्ज करू शकतील, असा अध्यादेश जारी केला. मात्र, महाविद्यालयांकडून अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

संशोधनासाठी विद्यार्थी क्षमतामहाविद्यालयीन संशोधन केंद्रांमध्ये संशोधनासाठी विज्ञान अभ्यासक्रमासाठी १० विद्यार्थी, सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमासाठी २० आणि विद्यापीठातील संशोधन केंद्रामध्ये ५० विद्यार्थी क्षमता निश्चित करण्यात आलेली आहे. संशोधन केंद्र असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कार्यरत मार्गदर्शक शिक्षकांकडेच विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करता येईल, या यूजीसीच्या मार्दर्शक सूचनेनुसार विद्यापीठातील अनेक मार्गदर्शक शिक्षकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, व्यवस्थापन परिषदेने प्रकुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. नुकतीच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात कुलगुरूंसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी