शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोनात घरीच प्रसूती होण्याचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:54 IST

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.

संतोष हिरेमठ

 औरंगाबाद : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.

औरंगाबादआरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १२१ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत चारही जिल्ह्यांची मिळून प्रसूतींची संख्या केवळ ६७ होती, अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.

या ४ जिल्ह्यांपैकी हिंगोलीत गेल्या ५ महिन्यांत घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरीच प्रसूती होण्यात चार जिल्ह्यांत हिंगोली पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ४२ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद आणि जालना आहे. प्रत्येकी ३८ महिलांची प्रसूती या दोन्ही जिल्ह्यांत घरीच झालेली आहे. घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण परभणीत सर्वाधिक कमी आहे.

काय आहे कारणे...

लॉकडाऊन काळात वेळीच वाहतुकीची सुविधा उपलब्ध न होणे, तीव्र प्रसूती कळांमुळे रुग्णालयात जाण्याची तयारी होतानाच घरीच प्रसूती होणे, त्याबरोबर कोरोनाच्या भितीपोटी रुग्णालयात जाण्याचे टाळून घरीच प्रसूती होण्यास प्राधान्य दिल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.

घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण- 

एप्रिल ते ऑगस्ट -२०२०- औरंगाबाद- ३८ , जालना - ३८, परभणी - ३, हिंगोली- ४२

घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण-

 एप्रिल ते ऑगस्ट -२०१९ - औरंगाबाद- २४, जालना - ७, परभणी - ४, हिंगोली- ३२ 

 

टॅग्स :Healthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीAurangabadऔरंगाबाद