शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनात घरीच प्रसूती होण्याचे वाढले प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:54 IST

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.

संतोष हिरेमठ

 औरंगाबाद : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. परंतु आजही महिलांची प्रसूती घरीच होणे थांबलेले नाही. घरीच प्रसूती होण्याच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत कोरोना काळात आणखी वाढ झाली असल्याचे समोर आले.

औरंगाबादआरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १२१ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत चारही जिल्ह्यांची मिळून प्रसूतींची संख्या केवळ ६७ होती, अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली.

या ४ जिल्ह्यांपैकी हिंगोलीत गेल्या ५ महिन्यांत घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. घरीच प्रसूती होण्यात चार जिल्ह्यांत हिंगोली पहिल्या क्रमांकावर आहे. येथे ४२ महिलांची प्रसूती घरीच झाली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद आणि जालना आहे. प्रत्येकी ३८ महिलांची प्रसूती या दोन्ही जिल्ह्यांत घरीच झालेली आहे. घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण परभणीत सर्वाधिक कमी आहे.

काय आहे कारणे...

लॉकडाऊन काळात वेळीच वाहतुकीची सुविधा उपलब्ध न होणे, तीव्र प्रसूती कळांमुळे रुग्णालयात जाण्याची तयारी होतानाच घरीच प्रसूती होणे, त्याबरोबर कोरोनाच्या भितीपोटी रुग्णालयात जाण्याचे टाळून घरीच प्रसूती होण्यास प्राधान्य दिल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली.

घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण- 

एप्रिल ते ऑगस्ट -२०२०- औरंगाबाद- ३८ , जालना - ३८, परभणी - ३, हिंगोली- ४२

घरीच प्रसूती होण्याचे प्रमाण-

 एप्रिल ते ऑगस्ट -२०१९ - औरंगाबाद- २४, जालना - ७, परभणी - ४, हिंगोली- ३२ 

 

टॅग्स :Healthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीAurangabadऔरंगाबाद