शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवा; देशात रस्ता अपघातानंतर आत्महत्यांचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:14 IST

आत्महत्या प्रतिबंधक दिन : कुटुंब व्यवस्थेपासून ते गळेकापू स्पर्धेपर्यंतची अनेक कारणे

ठळक मुद्देमहिलांचे प्रमाण कमीतणाव सहन करण्याची शक्ती कमी

- रुचिका पालोदकर 

औरंगाबाद : तणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे किंवा लहान- मोठ्या अपयशाने खचून गेल्यामुळे नैराश्याने घेरले जाऊन अनेक लोक थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. बदललेल्या कुटुंब व्यवस्थेपासून ते प्रत्येक क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे निर्माण होणारा ताण यासारख्या अनेक कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असून, याला प्रतिबंध म्हणून आणि याविषयी जागृती व्हावी म्हणून १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

आत्महत्या करण्याचे प्रमाण भारतामध्येही प्रचंड वाढले आहे. टाळता येणाऱ्या गोष्टीतून मृत्यू या प्रकारात भारतात रस्त्यांवरील अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त असून, दुसऱ्या क्रमांकावर आत्महत्या हे कारण आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने २००६ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आत्महत्येचे प्रमाण एका तासात १३ आत्महत्या एवढे होते. तसेच याच संस्थेने २०१५-१६ साली देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा २.५७ लाख एवढा नोंदविला आहे. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जवळपास ३७ टक्के आहे. जागतिक स्तराचा विचार केल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात ८ लाखांपेक्षाही अधिक लोक वर्षभरात आत्महत्या क रतात. 

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. रश्मीन आचलिया म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने २०१८ साली दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात महिलांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण हे एक लाख स्त्रियांमागे १६.४ एवढे, तर पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण एक लाख पुरुषांमागे २५ एवढे आहे. जगातील ७९ टक्के आत्महत्या या कमी व मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये होत आहेत. नैराश्यातूनच सर्वाधिक ७० ते ८० टक्के आत्महत्या होत असून, स्क्रिझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर या मनोविकारांतूनही आत्महत्या होतात. ही सर्व आकडेवारी चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महिलांचे प्रमाण कमीआत्महत्यांची आकडेवारी पाहिल्यास भारतामध्ये महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी आहे. याचे कारण म्हणजे भारतात अजूनही कुटुंबाचा आर्थिक भार हा बहुतांश वेळा पुरुषांवर असतो. ‘मेल इगो’ आड येऊन त्यातून होणारी घुसमट नैराश्य आणते आणि त्याचा शेवट आत्महत्या करण्यात होतो. व्यसनाधीनतेमुळेही अनेकदा नैराश्य येते आणि आत्महत्या केल्या जातात. तणाव सहन करण्याची ताकद तसेच कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला सांभाळून घेण्याची शक्ती महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे त्यांच्यात आत्महत्येचे प्रमाण कमी आहे.भारतात पुरुषांपेक्षा महिलांच्या आत्महत्या कमी होत असल्या तरी जागतिक आकडेवारीत भारताचे स्थान चिंताजनक आहे. जागतिक क्रमवारीत महिलांच्या आत्महत्यांमध्ये भारत ६ व्या स्थानावर, तर पुरुषांच्या आत्महत्या या क्रमवारीत भारत २२ व्या स्थानावर आहे. हुंडाबळी, कौटुंबिक होणारे त्रास, नैराश्य, विवाहबाह्य संबंध या गोष्टींमुळे भारतातील बहुतांश महिला आत्महत्या करतात. परीक्षेतील अपयश, अभ्यासाचा ताण, प्रेम प्रकरणातील अपयश ही तरुणांमध्ये आत्महत्येची प्रमुख कारणे दिसून येतात.

कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवाउत्तम पालकत्व आणि कुटुंबाची योग्य साथ यामुळे पुढील पिढीतील आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल. यासाठी पालकांनी मुलांसोबत वेळ घालविणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये एक लकोंडेपणातून येणारे नैराश्य टाळता येईल. १५ ते ४४ वर्षे या वयोगटात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य आत्महत्येची धमकी देत असेल, तर ही गोष्ट गांभीर्याने घ्या, त्याच्या अडचणी जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा.- डॉ. रश्मीन आचलिया