शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

उत्पन्न वाढीसाठी एसटी उतरणार मालवाहतूक क्षेत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:04 IST

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. 

औरंगाबाद : विविध कारणांमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक क्षेत्रात सेवा सुरू करण्याचा विचार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून, याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. 

एसटी महामंडळाचे कमी होत जाणारे प्रवासी भारमान, वाढते डिझेलचे दर, विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची कालमर्यादेत न होणारी प्रतिपूर्ती आणि कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आदींमुळे एसटी महामंडळाचा संचित तोटा वाढला आहे. तो भरून काढण्यासाठी उत्पन्नाचे पर्याय शोधण्याचा विचार उच्च पदस्थ अधिकाऱ्यांतून सुरू झाला. त्यानंतर मालवाहतूक सेवा सुरू करण्याचा विचार पुढे आला. राज्याच्या विविध भागांत स्थानक, आगारांच्या स्वरूपात मोक्याच्या ठिकाणी मोठमोठे भूखंड एसटी महामंडळाकडे आहेत. याचा वापर वेअर हाऊससाठी करण्याच्या विचाराधीन आहे. काही दिवसांपूर्वी एसटीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह परिवहनमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा उपक्रम सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रस्तावावर एसटी महामंडळातील विविध विभागांचे उच्च पदस्थ अधिकारी काम करीत असून, ते आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर ही सेवा सुरू केली जाणार आहे. प्रारंभी प्रवासी सेवेत नसलेल्या एक हजार बसेसना ट्रकरूपात बदलले जाणार आहे. या ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक सेवा सुरू केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे एसटीच्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

विनावापरातील बसेस स्क्रॅप करणारसात ते आठ वर्षे जुन्या प्रवासी सेवेत नसलेल्या बसेस स्क्रॅप करून त्याचे रूपांतर ट्रकमध्ये केले जाणार आहे. तसेच काही ट्रक विकत घेतले जाणार आहेत. यासाठी एक हजार चालकांची स्वतंत्र नियुक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारstate transportएसटीfundsनिधी