शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाच करावी लागतात शिपायांची कामे

By साहेबराव हिवराळे | Updated: December 15, 2023 19:19 IST

रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते; प्रत्यक्षात कधी?

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सामाजिक वनीकरणात ३५० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शिपायापासून ते वनअधिकारी अशी कामे करावी लागत आहेत. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सर्व कामे अधिकाऱ्यांना स्वत:च करावी लागत आहेत. त्याचा परिणाम इतर कामावरही होत असल्याची अधिकारीवर्गातून खंत व्यक्त होत आहे.

राज्यात सहा वनवृत्त, तर विभागीय वनअधिकारी कार्यालये आहेत. सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र स्तरावर २८९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. वनपाल, वनरक्षक, लिपिक पदे मंजूर असतात; परंतु ‘शिपाई’ हे पद मंजूर नाही. अधिकारी, वनपाल, वनरक्षक, लिपिक पदाच्या जागाही रिक्तच असून, त्यादेखील पूर्ण भरलेल्या नाहीत. नोकरभरती केली जात आहे, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही.

कार्यालयाचा पदभार अनेकांवर दुहेरी असल्याचेही निदर्शनास येते. निधीअभावी बहुतांश कामे रेंगाळून असून, कागदोपत्रीच मोठी मेहनत करावी लागत आहे. उर्वरित कामाचा निपटारा करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कामाला प्राधान्य द्यावे लागते. वनक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- पदनाम-             मंजूर पदे- भरलेली पदे - रिक्त पदे

-वनपरिक्षेत्र अधिकारी- २८९             - २५६             - ३३-वनपाल             - ५३९             -५२२             - १७-वनरक्षक             - ६३३                        -५२५             - १०८- लिपिक             - १५६                        -१०८             -४८-शिपाई             -०                         -०                        -०

शिपाई पदाची नोंदच नाहीक्षेत्रीय स्तरावरील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालये २८९ असून, त्यापैकी १३३ कार्यालयांत लिपिकांचे पदच मंजूर नाही. मंजूर लिपिकांपैकी १०८ पदे भरलेली आहेत. ४८ पदे रिक्तच आहेत. शिपाई पदाची तर नोंदच नाही. याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित होऊनही त्यावर काम सुरू नाही. त्यामुळे सर्व कामे अधिकाऱ्यांना स्वत: करावी लागतात. हे असे किती दिवस चालणार, असा सवाल अधिकारी दबक्या आवाजात करत आहेत. प्रश्न मार्गी लागावा याविषयी प्रत्येक मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देऊन महाराष्ट्र रेंजर असोसिएशनने मागण्या मांडल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण