शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनाच करावी लागतात शिपायांची कामे

By साहेबराव हिवराळे | Updated: December 15, 2023 19:19 IST

रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते; प्रत्यक्षात कधी?

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सामाजिक वनीकरणात ३५० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना शिपायापासून ते वनअधिकारी अशी कामे करावी लागत आहेत. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सर्व कामे अधिकाऱ्यांना स्वत:च करावी लागत आहेत. त्याचा परिणाम इतर कामावरही होत असल्याची अधिकारीवर्गातून खंत व्यक्त होत आहे.

राज्यात सहा वनवृत्त, तर विभागीय वनअधिकारी कार्यालये आहेत. सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र स्तरावर २८९ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. वनपाल, वनरक्षक, लिपिक पदे मंजूर असतात; परंतु ‘शिपाई’ हे पद मंजूर नाही. अधिकारी, वनपाल, वनरक्षक, लिपिक पदाच्या जागाही रिक्तच असून, त्यादेखील पूर्ण भरलेल्या नाहीत. नोकरभरती केली जात आहे, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात काहीच होत नाही.

कार्यालयाचा पदभार अनेकांवर दुहेरी असल्याचेही निदर्शनास येते. निधीअभावी बहुतांश कामे रेंगाळून असून, कागदोपत्रीच मोठी मेहनत करावी लागत आहे. उर्वरित कामाचा निपटारा करण्यासाठी सुटीच्या दिवशीही कामाला प्राधान्य द्यावे लागते. वनक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

- पदनाम-             मंजूर पदे- भरलेली पदे - रिक्त पदे

-वनपरिक्षेत्र अधिकारी- २८९             - २५६             - ३३-वनपाल             - ५३९             -५२२             - १७-वनरक्षक             - ६३३                        -५२५             - १०८- लिपिक             - १५६                        -१०८             -४८-शिपाई             -०                         -०                        -०

शिपाई पदाची नोंदच नाहीक्षेत्रीय स्तरावरील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालये २८९ असून, त्यापैकी १३३ कार्यालयांत लिपिकांचे पदच मंजूर नाही. मंजूर लिपिकांपैकी १०८ पदे भरलेली आहेत. ४८ पदे रिक्तच आहेत. शिपाई पदाची तर नोंदच नाही. याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित होऊनही त्यावर काम सुरू नाही. त्यामुळे सर्व कामे अधिकाऱ्यांना स्वत: करावी लागतात. हे असे किती दिवस चालणार, असा सवाल अधिकारी दबक्या आवाजात करत आहेत. प्रश्न मार्गी लागावा याविषयी प्रत्येक मुख्य वनसंरक्षकांना निवेदन देऊन महाराष्ट्र रेंजर असोसिएशनने मागण्या मांडल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण