शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात

By बापू सोळुंके | Updated: February 17, 2025 17:06 IST

परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती

छत्रपती संभाजीनगर : कलावंतही समाजाचाच एक भाग असतात. कोणी डाव्या, तर कोणी उजव्या विचारसरणीचे असतात. यातील कोणी भीतीपोटी सडेतोड व्यक्त होत नाही, तर काहींना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार हवे असतात. ही वस्तुस्थिती असल्याचे अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की, कलावंतांनी कोणालाही न घाबरता व्यक्त झाले पाहिजे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ वे साहित्य संमेलनात रविवारी शेवटच्या दिवशी 'समाज, साहित्य, चित्रपट व मालिका' या विषयावर आयोजित परिसंवादात अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी आणि लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सहभाग नोंदविला. रेडिओ जॉकी (आर. जे.) प्रेषित रुद्रावार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. समाज, साहित्य, चित्रपट व मालिकांमधून समााजाचे प्रतिबिंब दिसते का, असा प्रश्न केला. यावर चंदनशिवे म्हणाले की, संगीत शारदा नाटकातून अल्पवयीन मुलीचे तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या वरासोबत केलेल्या लग्नावर भाष्य करण्यात आले होते. तर आताच्या काळात चित्रपट, मालिकांमधून फार कमी समाजाचे चित्रण दाखविण्यात येते, हे दुर्दैव आहे. प्रत्येक समाजाच्या भावनांचे चित्रण उमटले पाहिजे, असे आम्हालाही वाटते.

गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या की, यासाठी सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना ‘फिल्म आणि नाटक साक्षर’ करावे लागेल. हे काम प्रत्येक कलावंतास करावे लागेल. बऱ्याचदा समाजाला कळत नाही की, या आपल्याच समस्या आहेत. कडक निर्बंध असताना इराणी सिनेमा चांगला फोफावला आहे. आपल्याकडेही सेन्सॉरशिप आहे. मात्र अशा परिस्थितीतही सत्य शोधत राहावे लागेल, असे गीतांजली म्हणाल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमाliteratureसाहित्यmarathiमराठी