शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात

By बापू सोळुंके | Updated: February 17, 2025 17:06 IST

परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती

छत्रपती संभाजीनगर : कलावंतही समाजाचाच एक भाग असतात. कोणी डाव्या, तर कोणी उजव्या विचारसरणीचे असतात. यातील कोणी भीतीपोटी सडेतोड व्यक्त होत नाही, तर काहींना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार हवे असतात. ही वस्तुस्थिती असल्याचे अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की, कलावंतांनी कोणालाही न घाबरता व्यक्त झाले पाहिजे.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ वे साहित्य संमेलनात रविवारी शेवटच्या दिवशी 'समाज, साहित्य, चित्रपट व मालिका' या विषयावर आयोजित परिसंवादात अभिनेत्री चिन्मयी सुमित, गीतांजली कुलकर्णी आणि लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सहभाग नोंदविला. रेडिओ जॉकी (आर. जे.) प्रेषित रुद्रावार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. समाज, साहित्य, चित्रपट व मालिकांमधून समााजाचे प्रतिबिंब दिसते का, असा प्रश्न केला. यावर चंदनशिवे म्हणाले की, संगीत शारदा नाटकातून अल्पवयीन मुलीचे तिच्यापेक्षा तिप्पट वयाच्या वरासोबत केलेल्या लग्नावर भाष्य करण्यात आले होते. तर आताच्या काळात चित्रपट, मालिकांमधून फार कमी समाजाचे चित्रण दाखविण्यात येते, हे दुर्दैव आहे. प्रत्येक समाजाच्या भावनांचे चित्रण उमटले पाहिजे, असे आम्हालाही वाटते.

गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या की, यासाठी सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना ‘फिल्म आणि नाटक साक्षर’ करावे लागेल. हे काम प्रत्येक कलावंतास करावे लागेल. बऱ्याचदा समाजाला कळत नाही की, या आपल्याच समस्या आहेत. कडक निर्बंध असताना इराणी सिनेमा चांगला फोफावला आहे. आपल्याकडेही सेन्सॉरशिप आहे. मात्र अशा परिस्थितीतही सत्य शोधत राहावे लागेल, असे गीतांजली म्हणाल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमाliteratureसाहित्यmarathiमराठी