शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले; रेबिजमुळे ५ जणांचा मृत्यू

By मुजीब देवणीकर | Updated: September 29, 2023 18:48 IST

छत्रपती संभाजीनगरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी

छत्रपती संभाजीनगर : शहरात मोकाट श्वानांची संख्या किती, याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. मात्र चार वर्षात रेबिजमुळे पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला.

रेबिजमुक्त शहर व्हावे यासाठी पाऊल उचलण्यात आले असून, चालू आर्थिक वर्षात एकही रेबिजचा रुग्ण आढळून आलेला नाही. चार वर्षात १३ हजार ६३३ नागरिकांना श्वान चावले. ३३ हजार ६१२ श्वानांची नसबंदी करून रेबिजची लस देण्यात आली, असे मनपाची आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात शहरात रस्त्या-रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी आहेत. शहरात किमान ४० हजार श्वान असावेत. रात्री १० वाजेनंतर कोणत्याही भागात पायी फिरता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

रेबिजवर कोणतेही औषध नाही. रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. श्वानाला रेबिज प्रतिबंधात्मक लस दिलेली असल्यास रुग्णाला फारसा धोका नसतो. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाला लसीकरण करून घ्यावेच लागते. दरवर्षी शहरात किमान १० हजार नागरिकांना श्वान चावतात. २०२०-२१ या वर्षात ३ व २०२२-२३ या वर्षात २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. मोकाट श्वानांची संख्या वाढतच चालली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा, रात्री श्वानांच्या मोठमोठ्या झुंडी पहायला मिळतात. अनेकदा हे श्वान वाहनचालकांच्या अंगावर धावून जातात. श्वानांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी महापालिकेने खाजगी संस्थेच्या माध्यमातून श्वान निर्बीजीकरण माेहीम काही वर्षांपासून हाती घेतली. चार वर्षांत ३३,६१२ श्वानांची नसबंदी, रेबिज लसीकरण करण्यात आले. ज्या श्वानांची नसबंदी केली जाते, त्याचे कान (खूण म्हणून) थोडेसे कापण्यात येतात.

नागरिकांनी काळजी घ्यावीनागरिक किंवा लहान मुलांना लहान पिल्ले असलेल्या श्वानाजवळ जाऊ देऊ नका, मुलांना एकटे पाठवू नये. भटक्या श्वानांना दगड मारणे अथवा अन्य प्रकारे त्रास देऊन उत्तेजित करू नये, ज्यामुळे श्वान चावण्याची दाट शक्यता असते. श्वान चावल्यानंतर सर्वप्रथम ती जागा स्वच्छ साबणाने धुवून घ्यावी, त्वरित लस घ्यावी.- शेख शाहेद, पशुसंवर्धन अधिकारी, मनपा

श्वान परवाना बंधनकारकश्वान मालकांनी पाळीव श्वानाचा मनपाकडून परवाना काढणे बंधनकारक असून, न काढल्यास ३ हजार रुपये दंड किवा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे मनपाने कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्रा