शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ

By सुमित डोळे | Updated: March 15, 2024 12:14 IST

चिकलठाण्यात समाजकंटकांकडून तरुणांना फूस लावण्याचे प्रकार, ४८ तासात चार गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यात धार्मिक स्थळांमधील प्रार्थनेच्या आवाजावरून मंगळवारी निर्माण झालेला तणाव बुधवारी रात्रीपर्यंत कायम राहिला. स्थानिकांसह काही संघटनांनी बुधवारी रात्री ८ वाजता महाआरतीचे आयोजन केले होते. आरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. याच ठिकाणी एक रिक्षा (एम एच २० - ई एफ - ६८७२) आणून त्यात दगड भरून गंभीर घटनेसाठी कट रचला जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी धाव घेताच रिक्षा सोडून दगड भरणाऱ्या दंगेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा रिक्षा जप्त करत स्वतंत्र गुन्हा दाखल केला.

धार्मिकस्थळातील आरतीचा आवाज कमी करण्याच्या मागणीवरून मंगळवारी रात्री वाद उफाळून आला. चर्चेदरम्यानच एका गटाने महिला, स्थानिकांना मारहाण केल्याने तणाव वाढला. परिणामी, अर्ध्या तासात चिकलठाण्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुधवारी याच ठिकाणी पुन्हा महाआरती करण्यात आली, तेव्हा मोठी घोषणाबाजी झाली. परिणामी, परिसरात पुन्हा तणाव झाला. रात्री ११ वाजेपर्यंत जमावाला पांगवून परिसर शांत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

दगड गोळा करण्यासाठी कोणी दिली चिथावणी?पुष्पक गार्डन परिसरात तरुण घसरून पडल्यानंतर धिंगाणा सुरू झाल्याचे कळताच उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव यांनी धाव घेतली. शांततेचे आवाहन केले. मात्र, तरीही दगडफेक केली गेली. पोलिसांनी पुन्हा सौम्य लाठीमार केला. तेव्हा काही अंतरावर तरुण लाठ्याकाठ्यांसह जमाव जमवण्याचा प्रयत्न करत होते. तर काहींनी रिक्षा आणून त्यात दगड भरण्यास सुरुवात केली. पोलिसांना तिकडे धाव घेताच दगड भरणाऱ्यांनी पळ काढला. वरिष्ठांच्या आदेशावरून सहायक फौजदार ज्ञानेश्वर सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेबाबत भूमिका सावधचया संपूर्ण घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात ४८ तासात एकूण ४ गुन्हे दाखल झाले. आरतीच्या आवाजावरून मारहाण केल्याप्रकरणी कृष्णा नागे याच्या तक्रारीवरून लैला नावाची महिला, शकील जैनोद्दीन शेख, अखिल जैनोद्दीन शेख, अनिस जैनोद्दीन शेख यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सरकारी पक्षातर्फे जमावावर दंगलीचा दुसरा गुन्हा दाखल केला. तर एका महिलेच्या तक्रारीवरून रमेश दहिहंडे, कृष्णा नागे, बाबुराव जाधवसह एकूण ७ जणांवर तिसरा तर बुधवारच्या रात्रीच्या तणावाप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला. अटकेबाबत मात्र पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक नव्हती.

तरुणांना फूस लावण्याचे प्रकारसमाजकंटकांकडून तरुणांना फूस लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजी व आडमुठ्या भुमिकेमुळे देखील तणाव वाढल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानमधील पहिला शुक्रवार उद्या आहे. शिवाय चिकलठाण्यात आठवडी बाजार देखील भरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीदार घराबाहेर पडतील. यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी परिसरातून रुट मार्च काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद