शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीसाठी 'अग्नि' परीक्षा देताना तरुण मैदानात कोसळला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

By योगेश पायघन | Updated: August 18, 2022 16:12 IST

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या अग्निविर भरती सुरू आहे.

औरंगाबाद: अग्निपथ योजनेत भरतीसाठी आलेला एक २१ वर्षीय तरुण मैदानी चाचणी सुरु असताना बुधवारी रात्री चक्कर येऊन कोसळला. त्यानंतर  शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारादरम्यान त्याचा आज दुपारी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. करण नामदेव पवार( २१, रा. विठ्ठलवाडी ता. कन्नड ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या अग्निविर भरती सुरू आहे. यासाठी कन्नड तालुक्यातील  विठ्ठलवाडी येथील २१ वर्षीय तरुण करण नामदेव पवार देखील भरतीसाठी आला होता. बुधवारी रात्री १२ वाजता शेवटचा ग्राऊंड काढत असतांना करण चक्कर येऊन पडला.  त्यामुळे त्याला लागलीच शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. 

पार्किंग, निवारा, नाश्ता, पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव विद्युत कॉलनीतून भरतीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पार्किंगची व्यवस्था नसल्याने भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मैदानी चाचणी पास केलेल्या विद्यार्थ्यांना दिवसभर नाश्ता, जेवणाची व्यवस्था पुरेशी नव्हती. अन्नदान व विद्यार्थ्यांना मदत करू इच्छिणाऱ्यांना आतमध्ये जाण्यास परवानगी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. मैदानी चाचणी पास केलेल्या शेवटच्या उमेदवारांना बाहेर पडण्यास बुधवारी १० वाजेपेक्षा अधिक वेळ लागला. दहा वाजता बाहेर पडलेल्या उमेदवारांना परत गुरुवारी सकाळी पाच वाजता वैद्यकीय तपासणीसाठी बोलावण्यात आल्याने त्या विद्यार्थ्यांना मुक्कामी राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यांच्या राहण्याची काही संस्थांनी मोफत व्यवस्था केली. मात्र, अनेकांना रस्त्यालगत सहारा घ्यावा लागला. आतमध्ये स्वच्छतागृहे कमी व अस्वच्छ आहेत. बाहेर आलेल्या विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठी व पाऊस आल्यास आडोशाला जागा नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे पार्किंग, ग्राउंडमध्ये प्रवेशित शिवाय असलेल्यांना थांबण्याची व्यवस्था, जेवण, नाश्ता, थांबण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी भरतीसाठी आलेल्या महेश बकाल यांनी केली.

मध्यरात्री १२ वाजता होते प्रक्रिया सुरुअग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलाच्या भरती प्रक्रियेला १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर विद्यापीठाच्या मैदानावर सुरुवात झाली. २३ वयोगटापर्यंतच्या सहा पदांसाठी सुरू असलेल्या भरतीसाठी ८० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिस्तबद्धरीत्या मेलद्वारे १,२०० ते १,५०० विद्यार्थ्यांना एका दिवशी बोलावण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी, टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, लिपिक, ट्रेड्समन अशा पदांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. परीक्षा दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होती. तोच बुधवारी रात्री बोलावलेले उमेदवार विद्यापीठ परिसरात दाखल व्हायला सुरुवात झाली.

 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद