शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:01 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत.

औरंगाबाद: राज्याच्या राजकारणात गेल्या ४ महिन्यांपासून औरंगाबाद हे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातूनच त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळेच, औरंगाबादेतील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळात संधीही देण्यात आली. त्यापैकी, अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. त्यानंतर, त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली. या भेटीत जलील यांनी श्रीकांत शिंदे अन् मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं.  

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. दुसरीकडे कुठेतरी कॉर्नर सभा सुरु आहे, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. श्रीकांत शिंदे यांनी औरंगाबाद दौऱ्यात एमआयएमचे नेते आणि त्यांचे लोकसभेतील सहकारी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी, उपस्थित लोकांना उद्देशून छोटेखानी भाषणही केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या जलील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भरभरुन कौतुक केलं. 

जलील यांच्यावतीने क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी, एकदा का शब्द दिला की, तो पाळणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे होय, असे जलील यांनी म्हटले. तर, आम्ही दोघेही वेगळ्या पक्षाचे नेते आहोत, वेगळ्या विचारधारेचे लोकं आहोत. पण, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. आम्ही दोघेही मित्र आहोत. लोकसभेत आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळेच, त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 

श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या दौऱ्याचीही खिल्ली उडविली. सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेImtiaz Jalilइम्तियाज जलीलShrikant Shindeश्रीकांत शिंदेAurangabadऔरंगाबाद