शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:01 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत.

औरंगाबाद: राज्याच्या राजकारणात गेल्या ४ महिन्यांपासून औरंगाबाद हे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातूनच त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळेच, औरंगाबादेतील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळात संधीही देण्यात आली. त्यापैकी, अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. त्यानंतर, त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली. या भेटीत जलील यांनी श्रीकांत शिंदे अन् मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं.  

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. दुसरीकडे कुठेतरी कॉर्नर सभा सुरु आहे, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. श्रीकांत शिंदे यांनी औरंगाबाद दौऱ्यात एमआयएमचे नेते आणि त्यांचे लोकसभेतील सहकारी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी, उपस्थित लोकांना उद्देशून छोटेखानी भाषणही केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या जलील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भरभरुन कौतुक केलं. 

जलील यांच्यावतीने क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी, एकदा का शब्द दिला की, तो पाळणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे होय, असे जलील यांनी म्हटले. तर, आम्ही दोघेही वेगळ्या पक्षाचे नेते आहोत, वेगळ्या विचारधारेचे लोकं आहोत. पण, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. आम्ही दोघेही मित्र आहोत. लोकसभेत आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळेच, त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 

श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या दौऱ्याचीही खिल्ली उडविली. सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेImtiaz Jalilइम्तियाज जलीलShrikant Shindeश्रीकांत शिंदेAurangabadऔरंगाबाद