शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

'एकदा शब्द दिला तर ते पलटत नाहीत', जलील यांच्याकडून शिंदे पिता-पुत्रांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:01 IST

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत.

औरंगाबाद: राज्याच्या राजकारणात गेल्या ४ महिन्यांपासून औरंगाबाद हे केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातूनच त्यांच्यासोबत गेले होते. त्यामुळेच, औरंगाबादेतील ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळात संधीही देण्यात आली. त्यापैकी, अब्दुल सत्तार हे कृषीमंत्री झाल्यापासून चांगलेच चर्चेत आहेत. नुकतेच सत्तार यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. त्यानंतर, त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांचीही भेट घेतली. या भेटीत जलील यांनी श्रीकांत शिंदे अन् मुख्यमंत्र्यांचे भरभरुन कौतुक केलं.  

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सिल्लोडमध्ये दोन जाहीर सभा होणार, अशी चर्चा होती. सोमवारी सिल्लोडमध्ये केवळ आपलीच जाहीर सभा होत आहेत. दुसरीकडे कुठेतरी कॉर्नर सभा सुरु आहे, असे म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. श्रीकांत शिंदे यांनी औरंगाबाद दौऱ्यात एमआयएमचे नेते आणि त्यांचे लोकसभेतील सहकारी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. यावेळी, उपस्थित लोकांना उद्देशून छोटेखानी भाषणही केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या जलील यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे भरभरुन कौतुक केलं. 

जलील यांच्यावतीने क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. याठिकाणी श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी, एकदा का शब्द दिला की, तो पाळणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे होय, असे जलील यांनी म्हटले. तर, आम्ही दोघेही वेगळ्या पक्षाचे नेते आहोत, वेगळ्या विचारधारेचे लोकं आहोत. पण, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. आम्ही दोघेही मित्र आहोत. लोकसभेत आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळेच, त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी आलो होतो, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 

श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या दौऱ्याचीही खिल्ली उडविली. सुरुवातीला १० मिनिटांचा दौरा असायचा, आता ही वेळ वाढून २० मिनिटांची झाली. इतके दिवस यांना वांद्रे हेच जग आणि पक्ष वाटत होता. मात्र, या लोकांना वांद्र्यावरुन बांधापर्यंत आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं आहे, अशी टिप्पणी श्रीकांत शिंदे यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेImtiaz Jalilइम्तियाज जलीलShrikant Shindeश्रीकांत शिंदेAurangabadऔरंगाबाद