शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शहरात फक्त 3 दिवस संचारबंदी लावा; व्यापारी महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 4:10 PM

यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.

ठळक मुद्देव्यापारी प्रतिनिधींनी १० दिवसांऐवजी तीन दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत मांडले.  

औरंगाबाद : बेशिस्त लोकांना प्रतिबंध करणे व परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शहरात १० ते १२ जुलैदरम्यान संचारबंदी लागू करण्यात यावी, यावर लोकप्रतिनिधी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यात गुरुवारी सुभेदारीत झालेल्या बैठकीत सहमती झाली. यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.

यावेळी खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे तसेच महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, माजी अध्यक्ष अजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शहरात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या आणि बेशिस्त नागरिकांबद्दल  चिंता व्यक्त झाली. आ. शिरसाट व आ. दानवे यांनी शहरात १० दिवस संचारबंदी लागू करावी, असे नमूद केले. व्यापारी प्रतिनिधींनी १० दिवसांऐवजी तीन दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत मांडले.  

आ. सावे यांनी सांगितले की, संचारबंदीत संपूर्ण किराणा दुकाने तसेच औषधी दुकानेही बंद ठेवण्यात यावीत. जिथे हॉस्पिटल आहे तिथे औषधी दुकाने उघडी ठेवावीत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोणालाही पास  देऊ नये. अगदी लोकप्रतिनिधींनादेखील असे पास दिले जाऊ नये, असे केले तरच संचारबंदीचा उद्देश सफल होईल. आ. शिरसाट यांनी सांगितले की, संचारबंदीत जे विनाकारण बाहेर पडतील, त्यांना पोलिसांनी फटके मारावेत, तर आ. दानवे म्हणाले की, संपूर्ण शहरात संचारबंदी असावी. 

लॉकडाऊन नकोच : मानसिंग पवार म्हणाले की, लॉकडाऊन केल्याने रुग्ण संख्या कमी झाली, असा अभ्यास झाला नाही. लॉकडाऊन करण्यामुळे सामाजिक प्रश्न वाढतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय