शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले, 'महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 8:44 PM

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

ठळक मुद्देमी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाहीडॉ. कराड यांनी सांगितले पीएमओमधून फोन आल्यानंतर काय घडले

औरंगाबाद : ''राज्यातून केंद्रीय मंत्री कोण होणार या चर्चेतही माझे नाव नव्हते अन अचानक मला पीएमओमधून फोन आला. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) , भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P. Nadda ) यांची भेट झाली आणि त्यानंतर शपथविधी झाला,'' असा थक्क करणारा प्रवास उलगड होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड( Bhagwat Karad ). त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी एका बैठकीदरम्यान  'महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील' असे म्हटले. त्यावर मी डॉक्टर आहे, तुम्हाला निराश करणार नाही असा शब्द दिल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. ते लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा ( Rajendra Darda ) यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. ( "Important ministerial posts have been given, we have to work hard"; Dr. Karad told what happened after the phone call from the PMO )   

राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले. भाजपकडून राज्यातून मंत्रीमंडळात कोण स्थान पटकावणार याची जोरदार चर्चा मंत्रीमंडळ विस्ताराच्या पूर्वी सुरु होती. परंतु, यात डॉ. कराड यांचे नाव नव्हते. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत डॉ. कराड यांची प्रधानमंत्र्यांनी अर्थ राज्यमंत्री पदी निवड केली. यामुळे सर्वांना डॉ. कराड यांची मंत्रीपदी निवड कशी झाली ? त्या दोन दिवसात काय घडले याची उत्सुकता आजही आहे. यावर आणि औरंगाबाद तसेच महाराष्ट्रासाठीच्या व्हिजनवर लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांनी डॉ. कराड यांना बोलते केले. 

डॉ. कराड यांनी यावेळी त्यांचा राजकारणात प्रवास लोकमतचे एडिटर-इन -चीफ राजेंद्र दर्डा यांच्यामुळे झाल्याचे नमूद करत मंत्रीपद मिळण्याच्या आधी काय घडले हे उलगडले. ते म्हणाले, ''केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. मी औरंगाबादमध्येच होतो, अचानक पीएमओमधून फोन आला. तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत दिल्लीला येयचे आहे. का बोलवले असेल हे मी समजलो. मात्र, पुढचे काही तास तर मंत्रीपदी निवड झाल्यावर विश्वासच बसत नव्हता. मी तो नंबर खरेच पीएमओचा आहे का हे तपासून खात्री केली. त्यानंतर पुणे येथून दिल्ल्लीला गेलो आणि दुसऱ्यादिवशी संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यासोबत इतर खासदारही होते. मोदीजी यांनी तुमची मंत्रीपदी निवड झाल्याचे सांगितले. त्यानंतर शपथविधी झाला' डॉ. भागवत कराड सांगत असलेला हा रोमांचक प्रवास औरंगाबादमधील प्रतिष्ठित नागरिक थक्क होऊन ऐकत होते. मंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर एका बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांनी, मोठे आणि महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील असे सांगितले. यावर मी डॉक्टर आहे, कष्ट करण्याची मला सवय आहे. तुम्हाला निराश करणार नाही, असा शब्द दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. 

औरंगाबादचा करणार कायापालटरेल्वे, पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबादचे सामर्थ्य वाढविण्यासाठी दीर्घकालीन लाभ योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. शहरात बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारे मसुरी सारखे केंद्रीय केंद्र सुरु करण्याचा संपल्प त्यांनी बोलून दाखवला. शहराची कनेक्टीव्हिटी वाढवणे, नवीन उद्योग शहरात आणणे, अजिंठा-वेरूळ-दौलताबाद या समृद्ध पर्यटन क्षेत्राचा येत्या काळात चेहरा बदलण्याची योजना तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतRajendra Dardaराजेंद्र दर्डाLokmatलोकमतAurangabadऔरंगाबादBJPभाजपा