शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

'हा तर मराठा क्रांती मोर्चाला बदनाम करण्याचा डाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 16:01 IST

मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास..

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. मुख्यमंत्र्यांना रोखायचे असल्यास, पंढरपूर परिसरापासून दूरच रोखावे, असा निर्णय औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले आहे. नुकतेच वारीतील काही संघटनांचा वारकऱ्यांना इजा पोहोचविण्याचा डाव असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजातील आंदोलकांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मराठा क्रांती मोर्चा औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी लोकमतशी बोलताना म्हटले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीनिमित्त होणारी विठ्ठलाची शासकीय पूजा न करू देण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात विठ्ठलाची पूजा न करु देण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी 10 लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, मी विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरात येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, लगेच मराठा क्रांती मोर्चाकडून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मराठा समाज कटिबद्ध असून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना अडवायचे झाल्यास, आम्ही पंढरपूरपासून दूरच्या अंतरावरच अडवू, पंढरपुरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.  मराठा आंदोलकांच्या नावाने काही समाजविघातक संघटनांकडून अपप्रचार आणि अनुचित प्रकार घडेल आणि त्याचे खापर मराठा समाजाच्या नावावर पडेल. मात्र, मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना पंढरपूरापासून दूरच अडविले जाईल. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस