शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

निर्बंध असतानाही बांधकाम विभागात उठाठेव; लॉकडाऊनच्या काळात ४.५ कोटींच्या निविदा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 16:47 IST

मनपाची सर्व कामे ठप्प असताना बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांच्या निविदांचा बार उडविण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेच्या हद्दीतील सहा वॉर्डांतील कामेप्रशासकीय मान्यता जून महिन्यात मिळाल्याची चर्चा

- विकास राऊत

औरंगाबाद : लॉकडाऊन असताना बांधकाम विभागाने साडेचार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मंजूर केल्याची माहिती समोर आली. हे एक प्रकरण समोर आले असून, यापेक्षा जास्त कामांच्या निविदांचा कार्यभाग लॉकडाऊनमध्ये उरकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीतील सहा वॉर्डांतील कामांच्या या निविदा आहेत, मनपाची सर्व कामे ठप्प असताना बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या कामांच्या निविदांचा बार उडविण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व विकासकामांना शासनाने हळूहळू ब्रेक लावला. या ब्रेकचा फायदा बांधकाम विभागाने घेतला. २९ मार्च रोजी साडेचार कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. १२ एप्रिल २०२० पर्यंत निविदांची मुदत ठेवून सगळा कार्यभाग विभागाने साधला. महत्त्वाचे म्हणजे या कामासाठी दोन निविदा एकाच ठिकाणाहून २० मिनिटांच्या अंतराने भरण्यात आल्या आहेत. मार्च-एप्रिल महिन्यांत निविदांना मंजुरी दिल्यानंतर प्रशासकीय मान्यता जून महिन्यात मिळाल्याची चर्चा आहे.  प्रशासकीय मान्यता जून महिन्यात द्यायची होती, तर मग मार्च महिन्यात निविदा मंजूर करण्याची  घाई कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाच्या औरंगाबाद आणि जालना सर्कलमधील १२५, तर जिल्हा नियोजन विभागाची ५ कोटींची मिळून सुमारे १३० कोटींची रक्कम २७ आणि २८ मार्च या दोन तारखांच्या घोळात अडकून परत गेली आहे. ती रक्कम परत येण्याची शक्यता कमी असताना नव्या निविदांसाठी विभागाने परिश्रम घेतले. 

प्री-बीडदेखील केले नाहीमुख्य अभियंता पातळीवरील निविदांमध्ये प्री-बीड करणे आवश्यक असते; परंतु प्री-बीड न करताच निविदा मंजुरीची घाई कशासाठी केली, अशी कोणती इमर्जन्सी होती? दोन प्रशासकीय मान्यतांची गरज असताना एकत्रित निविदा काढण्यात आल्या. या निविदांमध्ये इतरांना सहभागी होता येऊ नये, यासाठीच ही उठाठेव केल्याची चर्चा आहे. मध्यंतरी याच कामांवरून शिवसेनेत राडा झाला होता.

बांधकाम अभियंत्यांचे मत असे...याबाबत बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले की,  निविदा कोणत्या हे माहिती घेतल्याशिवाय सांगता येणार नाही. साडेचार कोटींपेक्षा जास्त निविदा काढल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा ३१ मार्चपर्यंत बंदी होती. नंतर ४ मे रोजी फायनान्स विभागाचा अध्यादेश आला. ३१ मार्च ते ४ मेदरम्यान एखादी निविदा झालेली असेल, तर त्यात काही गैर नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका