शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन

By मुजीब देवणीकर | Updated: August 27, 2022 13:33 IST

पाण्यासाठी नागरिकांचा असाही प्रताप; मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर

औरंगाबाद : पिण्याचे पाणी शुद्ध, निर्जंतुक असावे, असे प्रत्येकाला वाटते. आपण ज्या ठिकाणाहून नळ कनेक्शन घेतोय, तेथे आजूबाजूला दूषित पाणी तर वाहत नाही, याची काळजीही घेतो. मात्र, चिकलठाणा येथे काही नागरिकांनी मनपाच्या मुख्य जलवाहिनीची चाळणी करीत चक्क गटारीतून शेकडो अवैध कनेक्शन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. मनपाच्या विशेष पथकाने ६१ अनधिकृत नळ खंडित केले. उद्याही याच ठिकाणी कारवाई सुरू राहणार आहे.

शहरात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. नवीन वसाहतींना पाणी देण्याची तरतूद मनपाकडे नाही. घरापासून लांब अंतरावर मनपाची जलवाहिनी जात असल्याचे कळताच नागरिक अवैध नळ कनेक्शन घेऊन मोकळे होतात. शहरातील अवैध नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी मनपाने तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथक बुधवारी सकाळीच चिकलठाणा येथे मुख्य जलवाहिनीच्या तपासणीसाठी दाखल झाले. या मुख्य जलवाहिनीच्या बाजूने छोटी गटारही आहे.

नागरिकांनी मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार पाहून मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. एवढ्या दूषित पाण्यातून नळ कनेक्शन नेलेच कसे, असा प्रश्न उपस्थितांना पडला. एकाच ठिकाणी तब्बल २११ अवैध नळ आढळले. नालीतील ढाप्यांखाली अनेक नळ आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना हे नळ कापायला बराच त्रास होत होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी