शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

नागरिकांचा प्रताप, मुख्य जलवाहिनीची चाळणी करत चक्क गटारीतून नेले अवैध नळ कनेक्शन

By मुजीब देवणीकर | Updated: August 27, 2022 13:33 IST

पाण्यासाठी नागरिकांचा असाही प्रताप; मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर

औरंगाबाद : पिण्याचे पाणी शुद्ध, निर्जंतुक असावे, असे प्रत्येकाला वाटते. आपण ज्या ठिकाणाहून नळ कनेक्शन घेतोय, तेथे आजूबाजूला दूषित पाणी तर वाहत नाही, याची काळजीही घेतो. मात्र, चिकलठाणा येथे काही नागरिकांनी मनपाच्या मुख्य जलवाहिनीची चाळणी करीत चक्क गटारीतून शेकडो अवैध कनेक्शन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. मनपाच्या विशेष पथकाने ६१ अनधिकृत नळ खंडित केले. उद्याही याच ठिकाणी कारवाई सुरू राहणार आहे.

शहरात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. नवीन वसाहतींना पाणी देण्याची तरतूद मनपाकडे नाही. घरापासून लांब अंतरावर मनपाची जलवाहिनी जात असल्याचे कळताच नागरिक अवैध नळ कनेक्शन घेऊन मोकळे होतात. शहरातील अवैध नळ कनेक्शन खंडित करण्यासाठी मनपाने तीन स्वतंत्र पथक नेमले आहेत. यातील उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथक बुधवारी सकाळीच चिकलठाणा येथे मुख्य जलवाहिनीच्या तपासणीसाठी दाखल झाले. या मुख्य जलवाहिनीच्या बाजूने छोटी गटारही आहे.

नागरिकांनी मुख्य जलवाहिनीला चाळणी करून गटारीतून एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांब नळ कनेक्शन नेल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार पाहून मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. एवढ्या दूषित पाण्यातून नळ कनेक्शन नेलेच कसे, असा प्रश्न उपस्थितांना पडला. एकाच ठिकाणी तब्बल २११ अवैध नळ आढळले. नालीतील ढाप्यांखाली अनेक नळ आहेत. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना हे नळ कापायला बराच त्रास होत होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी