शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

अवैध वाळू उपशामुळे पूर्णा नदीचे अस्तित्व धोक्यात; महसूल व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:38 IST

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे.

ठळक मुद्देलाखोंचा महसूल पाण्यात सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र 

चिंचोली लिंबाजी : परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातून शासकीय परवानगी नसताना नदीपात्रातील  आठही वाळूघाटांतून अवैध वाळूउपसा सुरू आहे. अनियंत्रित वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. नियंत्रण ठेवणारे महसूल व पोलीस विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे. पाच वर्षांपासून राजरोसपणे शासनाच्या गौण खनिज मालमतेची लूट होत असताना मात्र संबंधित यंत्रणेने ‘आपण सगळे मिळून खाऊ’ ची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. 

चिंचोली लिंबाजीसह करंजखेड, नागापूर, सावरगाव, पिशोर, नाचनवेल या भागांसह सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, आमठाना, देऊळगाव बाजार या भागात पूर्णा नदीतील वाळूला अधिक मागणी आहे. ही वाळू चांगल्या दर्जाची असल्याने तिला भावही चांगला मिळत असल्याने वाळूमाफियांचा डोळा पूर्णा नदीपात्रातील वाळूच्या उपशावर असतो. पूर्णा नदीकाठी वाकी, चिंचोली लिंबाजी, बरकतपूर, रायगाव, वाकद, शेलगाव, दिगाव, खेडी हे वाळूचे अधिकृत पट्टे आहेत. सरकारी नोंदीनुसार कुठल्याच वाळूपट्टयातून उपसा करण्याची परवानगी नाही, पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट असून सर्रासपणे महसूल आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून परिसरात वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. 

नागरिकांना होतो त्रास पूर्णा नदीपात्रातील वाकद, शेलगाव वगळता सहाही वाळू घाटात व रस्त्यांवर रात्रभर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरांच्या रांगा दिसून येतात. रात्रभर सुरू असलेल्या या अवैध वाहतुकीमुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे. मात्र, जबाबदार महसूल व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. किंबहुना अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र सूर्य मावळल्यानंतर बरकतीला येणाऱ्या या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल हाेते. वाळूचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली असली तरी ते आपल्या कुंपणाबाहेर जात नसल्याने वाळूचोरांचे चांगलेच फावते. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र दिवसेंदिवस रुंद होत असून अनेकांच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. यास काही प्रमाणास नदीकाठचे शेतकरीसुद्धा जबाबदार आहेत. पूर्वी नदीकाठचे शेतकरी नदीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशाला विरोध करायचे. त्यामुळे शेतकरी आणि वाळू माफियांत वाद होत. मात्र, नदीकाठच्या शेतकाऱ्यांनीच वाळूविक्री सुरू केल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. 

टॅग्स :riverनदीAurangabadऔरंगाबादsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग