शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्ह्यातील २७ महाविद्यालयांचे बिंग फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:47 IST

जिल्ह्यातील काही ज्युनिअर कॉलेजमध्ये इतर जिल्ह्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत असून त्यांच्याकडून भली मोठी  रक्कम  उकळण्यात येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत.

रऊफ शेख

फुलंब्री : किनगावच्या ज्युनिअर कॉलेजच्या अनागोंदी कारभाराची माहिती समोर येताच अनेक  संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.  जिल्ह्यातील  काही ज्युनिअर कॉलेजमध्ये इतर जिल्ह्यांसह परराज्यातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येत असून त्यांच्याकडून भली मोठी  रक्कम उकळण्यात  येत असल्याचे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत.

यात जिल्ह्यातील २७ महाविद्यालये असे प्रकार करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामुळे त्यांचे बिंग फुटणार असल्याने  संस्थाचालक हैराण झाले आहेत. मान्यता एका ठिकाणची, तर कॉलेज चालते दुसरीकडे असे प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असून याकडे  शिक्षण विभागासह विद्यापीठ प्रशासनसुद्धा डोळेझाक करत आहे. त्यामुळे संस्थाचालकांचे चांगलेच फावते आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात तीन ते चार वर्षांपुर्वी अशाच काही महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून ११ वी व १२ वीची मान्यता असल्याने संबंधित महाविद्यालयांतून दोन बॅचेस उत्तीर्ण होऊन निघाल्या आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कागदोपत्री  उपस्थित दाखविण्याचे  प्रकार  संस्थाचालकांकडून करण्यात येत आहेत.

वर्षभर अनुपस्थित राहिले तरी पास होण्याची हमी विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थी अशा  महाविद्यालयांना प्रवेश घेत  असून शिक्षणसंस्था  त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी