शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:17 IST

कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देवाळूज, चिकलठाणा, शेंद्रा : खंडित वीजपुरवठा आणि कमी दाबाने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.पाणी आणि विजेच्या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात उद्योजक संघटनांकडून बैठक घेण्याची मागणी केली जात असताना त्याची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महिनाभरापासून दखलच घेतलेली नाही. या प्रकारामुळेही उद्योगविश्वात संतापाचे वातावरण आहे.औद्योगिक वसाहतींना देण्यात येणारे पाणी शहरालगतच्या ४० हून अधिक गावांना दिले जात आहे. ‘एमआयडीसी’च्या वाळूज येथील ५ आणि शेंद्रा येथील ३ ठिकाणच्या वितरण व्यवस्थेवरून हे पाणी दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ‘एमआयडीसी’तर्फे गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. परंतु हे करताना औद्योगिक वसाहतींना पाण्याचा तुटवडा होणार नाही, या बाबीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे थोडाही वारा सुटत नाही, तोच वीजपुरवठा बंद होतो. हा प्रकार चिकलठाण्यात सर्वाधिक होत आहे. विजेअभावी वेळेवर उत्पादन देऊ शकत नसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा यासह जालना येथील औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. प्रसाधनगृहांमध्येदेखील पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारांची कुचंबणा होत आहे. उद्योजक संघटना २१ मेपासून ‘एमआयडीसी’सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात असून, वाळूज, शेंद्रा आणि जालना येथील उद्योगांचे पाणी काही प्रमाणात गावांना दिले जात आहे, असे ‘एमआयडीसी’च्या अभियंत्यांनी सांगितले.दोन महिन्यांत प्रश्न निकालीपावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालावधीत थोडासा त्रास होतो. सध्या वाळूजमध्ये काहीच अडचण नाही. चिकलठाण्यात इंडस्ट्रीयल-२ व रेडियंट अ‍ॅग्रो या दोन फीडरमध्ये दोष आहे. त्याची दुरुस्ती केली आहे. येथे भूमिगत केबलचे काम करण्यात येत आहे. दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होऊन हा प्रश्न निकाली निघेल.- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरणउद्योजकांच्या तक्रारीवाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा पुरवठा आणि विजेच्या गुणवत्तेचा प्रश्न भेडसावत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याने उपकरणे खराब होतात. ‘एमआयडीसी’कडे तक्रारी करूनही उद्योगांसाठी पुरेसे पाणीही मिळत नाही. यासंदर्भात उद्योजकांकडून तक्रारी येत आहेत. महावितरणने ‘सीएमआयए’बरोबर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई