शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

औरंगाबाद येथील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:17 IST

कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देवाळूज, चिकलठाणा, शेंद्रा : खंडित वीजपुरवठा आणि कमी दाबाने पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.पाणी आणि विजेच्या समस्येवर उपाययोजना करण्यासंदर्भात उद्योजक संघटनांकडून बैठक घेण्याची मागणी केली जात असताना त्याची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) महिनाभरापासून दखलच घेतलेली नाही. या प्रकारामुळेही उद्योगविश्वात संतापाचे वातावरण आहे.औद्योगिक वसाहतींना देण्यात येणारे पाणी शहरालगतच्या ४० हून अधिक गावांना दिले जात आहे. ‘एमआयडीसी’च्या वाळूज येथील ५ आणि शेंद्रा येथील ३ ठिकाणच्या वितरण व्यवस्थेवरून हे पाणी दिले जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ‘एमआयडीसी’तर्फे गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. परंतु हे करताना औद्योगिक वसाहतींना पाण्याचा तुटवडा होणार नाही, या बाबीकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे थोडाही वारा सुटत नाही, तोच वीजपुरवठा बंद होतो. हा प्रकार चिकलठाण्यात सर्वाधिक होत आहे. विजेअभावी वेळेवर उत्पादन देऊ शकत नसल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा यासह जालना येथील औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. प्रसाधनगृहांमध्येदेखील पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारांची कुचंबणा होत आहे. उद्योजक संघटना २१ मेपासून ‘एमआयडीसी’सोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.दरम्यान, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन एमआयडीसीत नियोजनाप्रमाणे पाणी दिले जात असून, वाळूज, शेंद्रा आणि जालना येथील उद्योगांचे पाणी काही प्रमाणात गावांना दिले जात आहे, असे ‘एमआयडीसी’च्या अभियंत्यांनी सांगितले.दोन महिन्यांत प्रश्न निकालीपावसाळ्याच्या सुरुवातीच्या कालावधीत थोडासा त्रास होतो. सध्या वाळूजमध्ये काहीच अडचण नाही. चिकलठाण्यात इंडस्ट्रीयल-२ व रेडियंट अ‍ॅग्रो या दोन फीडरमध्ये दोष आहे. त्याची दुरुस्ती केली आहे. येथे भूमिगत केबलचे काम करण्यात येत आहे. दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होऊन हा प्रश्न निकाली निघेल.- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, महावितरणउद्योजकांच्या तक्रारीवाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत विजेचा पुरवठा आणि विजेच्या गुणवत्तेचा प्रश्न भेडसावत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याने उपकरणे खराब होतात. ‘एमआयडीसी’कडे तक्रारी करूनही उद्योगांसाठी पुरेसे पाणीही मिळत नाही. यासंदर्भात उद्योजकांकडून तक्रारी येत आहेत. महावितरणने ‘सीएमआयए’बरोबर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई