शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

वीजचोरी कराल तर गुन्हे दाखल; ४८६ जणांवर कारवाई, ६२ लाख ५२ हजार दंड वसूल

By साहेबराव हिवराळे | Updated: October 27, 2023 13:06 IST

वीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथक तयार केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : उत्सवांच्या काळात म्हणजे गेल्या दोन महिन्यांत महावितरणने शहर व जिल्ह्यात एकूण ४८६ वीजचोरीची प्रकरणे उघड केली. त्या वीजचोरीची रक्कम ६२ लाख ५२ हजार वसूल केली.

वीजचोरी करणाऱ्यांवर काय कारवाई होते?एकूण जणांवर ५३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कोर्टात तडजोड देखील केली जाते. खटला चालवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते; परंतु ग्राहक तडजोड करून दंडात्मक रक्कम जमा करण्याची संधीही मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

महिनाभरात ४८६ जणांवर कारवाईसणासुदीचे दिवस सुरू असलेल्या महिन्यात रीतसर परवानगी न घेणे, कोटेशनऐवजी वीजचोरीची घटना उघडकीस आल्या आहेत. अनेकांनी दंडात्मक रक्कम जमा केली आहे. ज्यांनी ती रक्कम भरली नाही अशा लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. धोकेदायक जोडणी घेणेही अनेकांना धोकादायक ठरू शकते. हे जनतेनेही ओळखावे.

कोणत्या तालुक्यात किती कारवाया?

छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर, फुलंब्री, तालुक्यांसह जिल्ह्यातील ४८६ वीजचोरीची प्रकरणे पुढे आली आहेत. ६२ लाख ५२ हजार वसुली महावितरण कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण सणासुदीच्या काळात अधिक वाढते. वीजचोरीची प्रकरणं पुढे आली की, इतरही ग्राहकांना त्याचा फटका बसतो.पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखा वीजवापर वाढला अन् त्याचा परिणाम वीजपुरवठा खंडित होण्यावर होतो, ते टाळण्यासाठी महावितरण कंपनी कर्मचारी प्रयत्न करीत आहे.

६२ लाख ५२ हजार वसुलीवीजचोरी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात पथक तयार केले आहे. या पथकाची धडक मोहीम राबवून सप्टेंबर महिन्यात रीतसर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने क्रॉस चेक करीत कारवाई केली आहे. ६२ लाख ५२ हजार वसुली करण्यात आली आहे.

वीज गळती नको... रीतसर जोडणी घ्या...वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सर्वांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीच्या प्रयत्न करीत आहेत, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादelectricityवीजCrime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरण