शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2024 17:33 IST

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शोधून काढलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते करीत आहेत. त्यांचे ऐकून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

वडिगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत, त्या रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मंत्री होते. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारला महागात पडेलते म्हणाले की, आमची एकही नोंद खाेटी नाही. मात्र, त्यांचे ऐकून नोंदी रद्द करणार असाल तर हे चूक आहे. कुणबी नोंदी रद्द करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा समाजासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढणं सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते सरकारपुरस्कृत उपोषणवडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले त्यांचे पंटर असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून हे सरकारपुरस्कृत उपोषण असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ज्या प्रकारे ओबीसी नेते एकत्र झाले, त्याची दखल घेऊन विविध राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही एकत्र आला नाही तर मराठा लेकरांचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले.

काेयत्याने हातपाय तोडण्याची त्यांची भाषा कशी आहे?भुजबळांविषयी आपल्या एकेरी भाषेविषयी कुणबी नेते तायवाडे शनिवारी बोलले. तायवाडे हे मोठे नेते आहेत, त्यांनी समान न्याय करणे अपेक्षित आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर होता तेव्हा ओबीसी नेत्यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली होती. शिव्या दिल्या होत्या. आता मी बोललो तर तुम्हाला खालची भाषा वाटते, असा सवाल जरांगे यांनी केला.

भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत आहेतआमच्या नोंदी सापडल्यामुळे धनगर बांधवांचं काय नुकसान झालं? धनगर समाजाला मिळालं तेव्हा आम्ही कुठे विरोध केला. मग का धनगर समाज आमच्या विरोधात जात आहे, असा सवाल करीत भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ