शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2024 17:33 IST

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शोधून काढलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते करीत आहेत. त्यांचे ऐकून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

वडिगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत, त्या रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मंत्री होते. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारला महागात पडेलते म्हणाले की, आमची एकही नोंद खाेटी नाही. मात्र, त्यांचे ऐकून नोंदी रद्द करणार असाल तर हे चूक आहे. कुणबी नोंदी रद्द करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा समाजासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढणं सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते सरकारपुरस्कृत उपोषणवडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले त्यांचे पंटर असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून हे सरकारपुरस्कृत उपोषण असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ज्या प्रकारे ओबीसी नेते एकत्र झाले, त्याची दखल घेऊन विविध राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही एकत्र आला नाही तर मराठा लेकरांचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले.

काेयत्याने हातपाय तोडण्याची त्यांची भाषा कशी आहे?भुजबळांविषयी आपल्या एकेरी भाषेविषयी कुणबी नेते तायवाडे शनिवारी बोलले. तायवाडे हे मोठे नेते आहेत, त्यांनी समान न्याय करणे अपेक्षित आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर होता तेव्हा ओबीसी नेत्यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली होती. शिव्या दिल्या होत्या. आता मी बोललो तर तुम्हाला खालची भाषा वाटते, असा सवाल जरांगे यांनी केला.

भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत आहेतआमच्या नोंदी सापडल्यामुळे धनगर बांधवांचं काय नुकसान झालं? धनगर समाजाला मिळालं तेव्हा आम्ही कुठे विरोध केला. मग का धनगर समाज आमच्या विरोधात जात आहे, असा सवाल करीत भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ