शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: June 22, 2024 17:33 IST

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने शोधून काढलेल्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते करीत आहेत. त्यांचे ऐकून एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील, अशा शब्दांत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला.

वडिगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सोडविताना राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या खोट्या कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत, त्या रद्द करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मंत्री होते. या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारला महागात पडेलते म्हणाले की, आमची एकही नोंद खाेटी नाही. मात्र, त्यांचे ऐकून नोंदी रद्द करणार असाल तर हे चूक आहे. कुणबी नोंदी रद्द करणे सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझा समाजासाठी जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या समाजाच्या लेकरांसाठी लढणं सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते सरकारपुरस्कृत उपोषणवडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले त्यांचे पंटर असल्याचे भुजबळ यांनी जाहीरपणे सांगितले. यावरून हे सरकारपुरस्कृत उपोषण असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. ज्या प्रकारे ओबीसी नेते एकत्र झाले, त्याची दखल घेऊन विविध राजकीय पक्षांतील मराठा नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही एकत्र आला नाही तर मराठा लेकरांचे वाटोळे होईल, असेही ते म्हणाले.

काेयत्याने हातपाय तोडण्याची त्यांची भाषा कशी आहे?भुजबळांविषयी आपल्या एकेरी भाषेविषयी कुणबी नेते तायवाडे शनिवारी बोलले. तायवाडे हे मोठे नेते आहेत, त्यांनी समान न्याय करणे अपेक्षित आहे. तुम्ही ज्या व्यासपीठावर होता तेव्हा ओबीसी नेत्यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली होती. शिव्या दिल्या होत्या. आता मी बोललो तर तुम्हाला खालची भाषा वाटते, असा सवाल जरांगे यांनी केला.

भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत आहेतआमच्या नोंदी सापडल्यामुळे धनगर बांधवांचं काय नुकसान झालं? धनगर समाजाला मिळालं तेव्हा आम्ही कुठे विरोध केला. मग का धनगर समाज आमच्या विरोधात जात आहे, असा सवाल करीत भुजबळ हे धनगर आणि मराठा समाजात वाद लावत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ