शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते: फराह खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:52 IST

अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रकट मुलाखत

छत्रपती संभाजीनगर : आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते. माझ्यासाठी हीच बाब कायम महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम सिने दिग्दर्शिका फराह खान यांनी केले. ‘कभी हा कभी ना’ चित्रपट माझ्यासाठी जसा कोरिओग्राफर म्हणून महत्त्वाचा ठरला तसाच ओम शांती ओम डायरेक्टर म्हणून महत्त्वाचा होता, असेही त्यांनी नमूद केले.

१५ जानेवारीपासून प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे सुरू असलेल्या दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवारी दिग्दर्शिका फराह खान यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी त्यांची प्रकट मुलाखत (मास्टर क्लास) सिनेदिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी घेतली. त्या म्हणाल्या की, चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे गरजेचे असते. गाण्यातून चित्रपटाची कथा पुढे जाणे गरजेचे आहे. आयटम साँग पेक्षा अशी गाणी करणे मला जास्त आवडेल, असे त्यांनी नमूद केले. स्वप्न पाहिली तरच ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात येत असते. कोरिओग्राफी आणि डायरेक्टर या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्यासाठी लर्निंग प्रोसेस होती. कोरिओग्राफर म्हणून काम करत असले तरी दिग्दर्शक म्हणूनच काम करायचे, हे ठरवले होते. त्यामुळे ‘ओम शांती ओम’ सारखा चित्रपट केवळ चौदा दिवसांत लिहून पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. आपली आवड आणि व्यवसायाची सांगड घालता आली तर नक्कीच उत्तम निर्मिती होते.

अपयशाला खचून जाऊ नका...चार चित्रपटाची निर्मिती केली. त्यातील एकाला अपयश आले, मात्र अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने कामाला लागले तरच आपण पुढे जाऊ शकतो. यामुळे एका अपयशाने खचून जाऊ नका, असा सल्ला त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना दिला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcinemaसिनेमा