शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखले तर शिवसेना नगर, नाशिकचे दूध अडवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:44 IST

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाड्यात येणारे नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील दूध अडवण्याचा इशारा शिवसेनेने दिला.

औरंगाबाद : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राजकीय नेत्यांनी त्यांची साखर कारखानदारी राखण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाड्यात येणारे नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील दूध अडवण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला.

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्यासाठी पाणी देण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात साखर कारखान्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून मराठवाड्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्याचा घाट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नाशिकच्या मंडळींनी घातला आहे. न्यायालयात प्रकरण नेऊन ऊस जगविण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला पाण्यावाचून तडफडून मारण्याचा डाव आहे.  मराठवाड्यात येणारे पाणी अडवणार असाल, तर नगर जिल्ह्यातून दुधाचा एकही थेंब मराठवाड्यात येऊ दिला जाणार नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नगरचे पालकमंत्री राम शिंदे हेसुद्धा दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

शिर्डीच्या शिवसेना खासदारांचे काय?औरंगाबाद शिवसेनेतर्फे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे राम शिंदे यांच्या भूमिकांचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, शिर्डीचे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला तीव्र विरोध केला आहे. याला शिवसेनेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात बगल देण्यात आली आहे. याविषयी जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले की, नगरची शिवसेना मराठवाड्याच्या पाण्याला विरोध करीत असेल, तर त्यांची ती स्थानिक स्तरावरची भूमिका असेल. मात्र, विखे पाटील आणि राम शिंदे हे विरोधी पक्ष व मंत्रिमंडळात राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी विरोध करणे हे चुकीचे आहे.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीShiv Senaशिवसेना