शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखले तर शिवसेना नगर, नाशिकचे दूध अडवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:44 IST

मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाड्यात येणारे नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील दूध अडवण्याचा इशारा शिवसेनेने दिला.

औरंगाबाद : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील राजकीय नेत्यांनी त्यांची साखर कारखानदारी राखण्यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास मराठवाड्यात येणारे नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील दूध अडवण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला.

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्यासाठी पाणी देण्याच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात साखर कारखान्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून मराठवाड्यातील जनतेच्या तोंडचे पाणी पळविण्याचा घाट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि नाशिकच्या मंडळींनी घातला आहे. न्यायालयात प्रकरण नेऊन ऊस जगविण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला पाण्यावाचून तडफडून मारण्याचा डाव आहे.  मराठवाड्यात येणारे पाणी अडवणार असाल, तर नगर जिल्ह्यातून दुधाचा एकही थेंब मराठवाड्यात येऊ दिला जाणार नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह नगरचे पालकमंत्री राम शिंदे हेसुद्धा दुटप्पी भूमिका घेत आहेत. त्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

शिर्डीच्या शिवसेना खासदारांचे काय?औरंगाबाद शिवसेनेतर्फे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे राम शिंदे यांच्या भूमिकांचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, शिर्डीचे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनीही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याला तीव्र विरोध केला आहे. याला शिवसेनेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात बगल देण्यात आली आहे. याविषयी जिल्हाप्रमुख दानवे म्हणाले की, नगरची शिवसेना मराठवाड्याच्या पाण्याला विरोध करीत असेल, तर त्यांची ती स्थानिक स्तरावरची भूमिका असेल. मात्र, विखे पाटील आणि राम शिंदे हे विरोधी पक्ष व मंत्रिमंडळात राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांनी विरोध करणे हे चुकीचे आहे.

टॅग्स :WaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरणgodavariगोदावरीShiv Senaशिवसेना