शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:44 IST

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत.

औरंगाबाद : महाविकास आघाडीकडून खूप अपेक्षा आहेत. पण हे सरकार विशेषतः सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पुरेसे गंभीर नसल्याने दलित अत्याचाराबाबत महाराष्ट्र देशात तिसरा आहे. हे सर्व पाहता आगामी निवडणुका एकतर आम्ही स्वबळावर लढू. तसेच शिवसेना, भाजप आणि एमआयएमकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज़ोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.

कायदे बदला अशी कधी मागणी होत नाही. परंतु ॲट्राॅसिटी कायदा बदला अशी मागणी का होते, केंद्र सरकारने हा कायदा कडक केला. पण त्याची कठोर अंमलबजावणी का होत नाही, असे सवाल उपस्थित करून  अन्याय - अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा घेणार आहोत. सामाजिक न्याय खात्याचा निधी वेळोवेळी इतरत्र वळविण्यात येत असल्याचे कवाडे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आमचाही वाटा आहे. पण मंत्रिपद व आमदारकी द्या सोडून. निदान सत्तेतला ठरल्यानुसार वाटा तरी द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत. आम्ही आता वंचित राहिलो नाहीत, बाबासाहेबांमुळे आम्ही १९५६ सालीच संचित झाल्याचा टोला प्रा. कवाडे यांनी लगावला. यावेळी जयदीप कवाडे, जे. के नारायणे, लक्ष्मण कांबळे, रामदास लोखंडे, अशोक जाधव, प्रकाश जाधव, चरणदास इंगोले, राहुल प्रधान, गणेश बनवणे, संजय सोनवणे आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन