शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
3
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
4
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
5
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
6
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
7
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
8
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
9
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
10
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
11
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
12
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
13
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
14
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
15
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
16
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
17
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
18
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
19
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
20
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये

सेना, भाजप, एमआयएमकडून प्रस्ताव आल्यास आघाडी करण्यास तयार : जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 18:44 IST

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत.

औरंगाबाद : महाविकास आघाडीकडून खूप अपेक्षा आहेत. पण हे सरकार विशेषतः सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पुरेसे गंभीर नसल्याने दलित अत्याचाराबाबत महाराष्ट्र देशात तिसरा आहे. हे सर्व पाहता आगामी निवडणुका एकतर आम्ही स्वबळावर लढू. तसेच शिवसेना, भाजप आणि एमआयएमकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्याशी आघाडी करण्यास तयार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. ज़ोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ते सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.

कायदे बदला अशी कधी मागणी होत नाही. परंतु ॲट्राॅसिटी कायदा बदला अशी मागणी का होते, केंद्र सरकारने हा कायदा कडक केला. पण त्याची कठोर अंमलबजावणी का होत नाही, असे सवाल उपस्थित करून  अन्याय - अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांच्या कार्यशाळा घेणार आहोत. सामाजिक न्याय खात्याचा निधी वेळोवेळी इतरत्र वळविण्यात येत असल्याचे कवाडे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आमचाही वाटा आहे. पण मंत्रिपद व आमदारकी द्या सोडून. निदान सत्तेतला ठरल्यानुसार वाटा तरी द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन ऐक्यासंदर्भात रामदास आठवले वक्तव्ये करतात. मात्र स्वतः पुढाकार घेत नाहीत. ते स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना जाऊन भेटत नाहीत. आम्ही आता वंचित राहिलो नाहीत, बाबासाहेबांमुळे आम्ही १९५६ सालीच संचित झाल्याचा टोला प्रा. कवाडे यांनी लगावला. यावेळी जयदीप कवाडे, जे. के नारायणे, लक्ष्मण कांबळे, रामदास लोखंडे, अशोक जाधव, प्रकाश जाधव, चरणदास इंगोले, राहुल प्रधान, गणेश बनवणे, संजय सोनवणे आदी पत्रपरिषदेस उपस्थित होते.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेAurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन