शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

खड्डे बुजवता येत नसतील तर 'साडी नेसा व घरी बसा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 19:19 IST

अनोख्या आंदोलनात महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया

ठळक मुद्देरांजणगावात रहिवाशांनी केले अनोखे आंदोलनसाड्या बांधून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महिलांनी रस्त्यावर बांधल्या साड्या

वाळूज महानगर : रांजणगावच्या त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महिलांनी रस्त्यावर साड्या बांधून ग्रामपंचायतीचा निषेध केला.

या वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्यावर पाणी साचले आहे. दुचाकीस्वार व वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. या भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गतवर्षीही शिवसेनेच्या वतीने गाढवांच्या मदतीने गावातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी सेनेचे विभागप्रमुख कैलास हिवाळे, शहरप्रमुख रावसाहेब भोसले, जावेद शेख, भगवान साळुंके, विशाल काळे, बंडू तरटे, अर्जुन जाधव, अशोक लोहकरे आदींनी गावातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला होता. 

रस्त्यावर साड्या बांधून निषेधत्रिमूर्ती कॉलनीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे गुरुवारी या वसाहतीतील महिलांनी रस्त्यावर ठिकठिकाणी साड्या बांधून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचे काम पदाधिकाऱ्यांना करता येत नसेल, तर साडी नेसा व घरी बसा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

या प्रकाराची माहिती मिळताच उपसरपंच अशोक शेजूळ, सदस्य सुभाष सोनवणे, ज्ञानेश्वर वाघचौरे आदींनी या वसाहतीला भेट देऊन तूर्तास मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. येथील रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रकही मंजूर असून निविदा मंजूर होताच सिमेंट रोड केले जाणार असल्याचे उपसरपंच शेजूळ यांनी सांगितल्यामुळे महिलांनी रस्त्यावरील साड्या काढून घेतल्या. याविषयी सरपंच संजीवनी सदावर्ते म्हणाल्या की, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, गणपतीची स्थापना करण्यापूर्वीच अनेक वसाहतीतील खड्डे बुजविण्यात आले आहेत. गाव मोठे असल्यामुळे टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करण्यात येत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादWalujवाळूजgram panchayatग्राम पंचायत