शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

खड्डे बुजवता येत नसतील तर 'साडी नेसा व घरी बसा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 19:19 IST

अनोख्या आंदोलनात महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया

ठळक मुद्देरांजणगावात रहिवाशांनी केले अनोखे आंदोलनसाड्या बांधून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महिलांनी रस्त्यावर बांधल्या साड्या

वाळूज महानगर : रांजणगावच्या त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे गुरुवारी महिला व नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी महिलांनी रस्त्यावर साड्या बांधून ग्रामपंचायतीचा निषेध केला.

या वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे त्रिमूर्ती कॉलनीतील रस्त्यावर पाणी साचले आहे. दुचाकीस्वार व वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. या भागातील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गतवर्षीही शिवसेनेच्या वतीने गाढवांच्या मदतीने गावातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. मात्र, अनेक वसाहतीतील रस्त्याचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी सेनेचे विभागप्रमुख कैलास हिवाळे, शहरप्रमुख रावसाहेब भोसले, जावेद शेख, भगवान साळुंके, विशाल काळे, बंडू तरटे, अर्जुन जाधव, अशोक लोहकरे आदींनी गावातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला होता. 

रस्त्यावर साड्या बांधून निषेधत्रिमूर्ती कॉलनीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या वसाहतीतील नागरिकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे गुरुवारी या वसाहतीतील महिलांनी रस्त्यावर ठिकठिकाणी साड्या बांधून ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध केला. रस्त्याचे काम पदाधिकाऱ्यांना करता येत नसेल, तर साडी नेसा व घरी बसा, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.

या प्रकाराची माहिती मिळताच उपसरपंच अशोक शेजूळ, सदस्य सुभाष सोनवणे, ज्ञानेश्वर वाघचौरे आदींनी या वसाहतीला भेट देऊन तूर्तास मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. येथील रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रकही मंजूर असून निविदा मंजूर होताच सिमेंट रोड केले जाणार असल्याचे उपसरपंच शेजूळ यांनी सांगितल्यामुळे महिलांनी रस्त्यावरील साड्या काढून घेतल्या. याविषयी सरपंच संजीवनी सदावर्ते म्हणाल्या की, पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून, गणपतीची स्थापना करण्यापूर्वीच अनेक वसाहतीतील खड्डे बुजविण्यात आले आहेत. गाव मोठे असल्यामुळे टप्प्याटप्प्याने रस्त्याचे काम करण्यात येत आहेत. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादWalujवाळूजgram panchayatग्राम पंचायत