शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही तर,उद्योग येणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:34 IST

उद्योगांना धरणातून पाणीपुरवठा न करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. शासनाची तशी भूमिका असेल तर राज्यासह मराठवाड्यात नव्याने उद्योग येणार कसे? महाराष्ट्र सोडून इतरत्र उद्योगधंदे उभारायचे काय, असा संतप्त सवाल उद्योग वर्तुळातून शासनाला केला आहे.

ठळक मुद्देफडणवीसांच्या घोषणेवर तीव्र प्रतिक्रिया : महाराष्ट सोडून इतर राज्यांत जायचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उद्योगांना धरणातून पाणीपुरवठा न करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. शासनाची तशी भूमिका असेल तर राज्यासह मराठवाड्यात नव्याने उद्योग येणार कसे? महाराष्ट्र सोडून इतरत्र उद्योगधंदे उभारायचे काय, असा संतप्त सवाल उद्योग वर्तुळातून शासनाला केला आहे.वैजापूर येथील एका प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणातील पाणी उद्योगांना न देण्याची भूमिका जाहीर करून टाकली. मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य परत घ्यावे, अशी मागणीही उद्योजकांतून होत आहे.वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि नव्याने होणारे शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी इंडस्ट्री बेल्टला पाणी देण्याची हमी दिलेली असताना मुख्यमंत्र्यांनी डीएमआयसीला पाणी देणार नाही, असे वक्तव्य करून येथील नवीन गुंतवणुकीच्या संधी बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.दहा टक्के पाणी उद्योगांना, १५ टक्के घरगुती वापराला आणि ७५ टक्के सिंचनाला, असे धोरण ठरलेले असताना या धोरणांशी ही मुख्यमंत्र्यांची घोषणा विसंगत आहे. डीएमआयसीचे काम प्रगतिपथावर आहे, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, या आशेवर मराठवाड्यातील तरुण डीएमआयसीचा विकास होऊन उद्योग येण्याची वाट पाहत आहेत. नवउद्योगांना अधिक सोयी-सवलती देऊन त्यांना मराठवाड्याकडे आकर्षित करण्याऐवजी पाण्यासारखी मूलभूत गरजदेखील पूर्ण करण्यात येणार नाही, अशी घोषणा करून येणारे उद्योगही येथून जातील, असा सूर उद्योग वर्तुळातून आळविण्यात येत आहे.डीएमआयसीला पाण्याची हमी दिली आहेशासनाने डीएमआयसी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योग प्रकल्पाला पाणीपुरवठ्याची हमी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना पाणी देणार नाही, असे वक्तव्य करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे होते. वैजापूर येथे प्रचार सभेत बोलताना उद्योग आणि सिंचन या घटकांची सांगड घालण्याऐवजी उद्योगांना जलसंकटात टाकून नेमके त्यांना काय साध्य करायचे आहे हे कळण्यास मार्ग नाही. मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणे अपेक्षित आहे. कारण त्यांच्या घोषणेचा उद्योग वर्तुळात वेगवेगळ्या बाजूंनी संदेश गेला आहे. उद्योगांना भविष्याची चिंता वाटू लागली आहे, असे सीएमआयचे माजी अध्यक्ष तथा मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य मुकुंद कुलकर्णी म्हणाले.मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा निषेधडीएमआयसीमध्ये उद्योग आणण्याची घोषणा करता, पाणी देण्याची घोषणा करतात. मग अचानक उद्योगांना पाणी न देण्याचे वक्तव्य कोणत्या आधारे केले आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय कंपन्या डीएमआयसीमध्ये कशासाठी येतील. उद्योजकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य मागे घेतले पाहिजे. उद्योगांचा विकास करण्यासाठी सवलतींचे धोरण राबविण्याऐवजी मूलभूत सुविधांपासून उद्योगांना दूर ठेवण्याचा निर्णय घेणे योग्य नाही, असे मसिआचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन गायके यांनी सांगितले.सीएमआयएचे मुख्यमंत्र्यांना पत्रमुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे योग्य नाही. उद्योगांना पाणी देणार नाही, असे जाहीरपणे सांगणे हे जबाबदारीचे भान न ठेवता केलेले वक्तव्य आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी आवाहन केले आणि इकडे उद्योगांना पाणी देणार नाही, असे सांगायचे हे योग्य वाटत नाही. उद्योगांना २ टक्केच पाणी लागते. गळत्या कमी करून यंत्रणेत सुधारणा करण्याऐवजी पाणी देणारच नाही, अशी भूमिका विसंगत आहे. याबाबत सीएमआयएने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन वक्तव्याबाबत फेरविचार करण्याची मागणी केल्याचे सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले.

 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीMIDCएमआयडीसी