शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्तापालट करणे सहज शक्य: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:46 IST

मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली

छत्रपती संभाजीनगर : मराठा, दलित आणि मुस्लीम या तीन शक्ती एकत्र आल्यास राज्याची सत्तापालट करणे सहज शक्य आहे. हे तीनही समाज एकत्र येऊ नयेत, म्हणून सत्ताधारी मंडळी आपल्यातच झुंज लावत आहे, ही खेळी ओळखा व मनापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मराठा आक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाली. 

त्याप्रसंगी जरांगे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसचा ‘डीएनए’ ओळखणे अवघड आहे. सकाळी ते हिंदुत्ववादी असतात, दुपारी ते बहुजवादी असतात आणि सायंकाळी ते पुरोगामी असतात. रंग बदलणाऱ्या अशा माणसापासून सावध राहिले पाहिजे. राज्यात मराठा, दलित आणि मुस्लीम या तीनच शक्ती निर्णायक आहेत. हे तिघेजण संघटित झाले पाहिजेत. वरवर एकत्र येऊन चालणार नाही, तर मनापासून प्रक्रिया घडली पाहिजे. मग, काहीही अशक्य नाही. लक्षात ठेवा, एकटा कोणताही समाज स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यासाठी या तीन शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैव असे की, सत्ताधारी मंडळी या तिघांंना एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात सतत भांडणे लावून एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आपण ओळखले पाहिजे.

यावेळी ऊर्जाभूमीचे संकल्पक चेतन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ऊर्जाभूमीच्या माध्यमातून शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आणण्याचा परिवर्तनाचा हा विचार राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जाईल. मी ध्येयवेडा कार्यकर्ता आहे. मी उद्या कदाचित नसेलही. पण, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीचा विचार थांबणार नाही. आमच्या समाजाला आजपर्यंत अनेकांनी फक्त स्वार्थापायी वापरून घेतले. त्यामुळे यापुढील काळात भीमशक्तीला सोबत घेऊन आपण राज्यात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू करावे, याकडे चेतन कांबळे यांनी जरांगे पाटलांचे लक्ष वेधले.

यावेळी डॉ. प्रतिभा आहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला चेतन कांबळे यांनी क्रांतीची मशाल जरांगे पाटलांच्या हाती देऊन बाबासाहेबांची मूर्ती भेट दिली. व्यासपीठावर प्रा. सुनील मगरे, रखमाजी जाधव, चंद्रकांत भराड, विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांची उपस्थित होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर