शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्तापालट करणे सहज शक्य: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:46 IST

मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली

छत्रपती संभाजीनगर : मराठा, दलित आणि मुस्लीम या तीन शक्ती एकत्र आल्यास राज्याची सत्तापालट करणे सहज शक्य आहे. हे तीनही समाज एकत्र येऊ नयेत, म्हणून सत्ताधारी मंडळी आपल्यातच झुंज लावत आहे, ही खेळी ओळखा व मनापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मराठा आक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाली. 

त्याप्रसंगी जरांगे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसचा ‘डीएनए’ ओळखणे अवघड आहे. सकाळी ते हिंदुत्ववादी असतात, दुपारी ते बहुजवादी असतात आणि सायंकाळी ते पुरोगामी असतात. रंग बदलणाऱ्या अशा माणसापासून सावध राहिले पाहिजे. राज्यात मराठा, दलित आणि मुस्लीम या तीनच शक्ती निर्णायक आहेत. हे तिघेजण संघटित झाले पाहिजेत. वरवर एकत्र येऊन चालणार नाही, तर मनापासून प्रक्रिया घडली पाहिजे. मग, काहीही अशक्य नाही. लक्षात ठेवा, एकटा कोणताही समाज स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यासाठी या तीन शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैव असे की, सत्ताधारी मंडळी या तिघांंना एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात सतत भांडणे लावून एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आपण ओळखले पाहिजे.

यावेळी ऊर्जाभूमीचे संकल्पक चेतन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ऊर्जाभूमीच्या माध्यमातून शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आणण्याचा परिवर्तनाचा हा विचार राज्याच्या कानाकोपऱ्यांपर्यंत जाईल. मी ध्येयवेडा कार्यकर्ता आहे. मी उद्या कदाचित नसेलही. पण, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीचा विचार थांबणार नाही. आमच्या समाजाला आजपर्यंत अनेकांनी फक्त स्वार्थापायी वापरून घेतले. त्यामुळे यापुढील काळात भीमशक्तीला सोबत घेऊन आपण राज्यात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू करावे, याकडे चेतन कांबळे यांनी जरांगे पाटलांचे लक्ष वेधले.

यावेळी डॉ. प्रतिभा आहिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला चेतन कांबळे यांनी क्रांतीची मशाल जरांगे पाटलांच्या हाती देऊन बाबासाहेबांची मूर्ती भेट दिली. व्यासपीठावर प्रा. सुनील मगरे, रखमाजी जाधव, चंद्रकांत भराड, विद्रोही जलसाकार संभाजी भगत यांची उपस्थित होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर