शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करू: संजय राऊत

By बापू सोळुंके | Updated: August 13, 2024 18:53 IST

 एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.  

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने आणलेल्या योजना या बहिणींसाठी नसून आगामी विधानसभा निवडणुकीत मते विकत घेण्यासाठी असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. आमचे सरकार आल्यावर या योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी खा.राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकांची मुदत संपून तीन ते पाच वर्ष उलटत आहेत. मात्र या निवडणूका घेतल्या जात नाही. आता राज्यातील वातावरण प्रतिकूल असल्याने आगामी विधानसभा निवडणूक घेण्याची हिम्मत नाही, पण नाईलाजास्तव त्यांना या निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे खा.राऊत म्हणाले. पंतप्रधानांना देशभर सभा घेता याव्यात, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तारखा मॅनेज केल्या होत्या. मात्र महाराष्ट्रातील विरोधीपक्ष आणि जनता जागरूक असल्याने या सरकारला निवडणूक घेताना कोणताही घोळ घालता येणार नाही. आणखी काही योजना आणण्यासाठी राज्यसरकार विधानसभा निवडणूक एक महिना पुढे ढकलणार असल्याची चर्चा आहे, याकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाचे उत्तर देताना खा.राऊत म्हणाले की, सर्व प्रतिकूल परिस्थिती त्यांच्यासाठी आहे. त्यांनी जाहिर केलेल्या योजना बहिणींसाठी नसून मते विकता घेण्यासाठी असल्याचा आरोप केला. आमदार रवी राणा यांनी  मते न केल्यास लाडक्या बहिण योजनेचे पैसे परत घेतल्या जाईल, असे विधान केल्याकडे खा.राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ही यांची खरी मानसिकता आहे. पैसे का त्याच्या बापजाद्यांचे आहेत का, असा सवाल करीत हे पैसे लाडक्या बहिणींच्या हक्काचे आहेत.  एकनाथ शिंदे हा भावनाशून्य माणूस असल्याचेही ते म्हणाले.  महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. आमचे सरकार आल्यावर लाडक्या बहिण योजनेच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी विधानसभेत गद्दार आमदार दिसणार नाहीयोजनांविषयी यांचा हेतू चांगला नाही. यामुळे बारामतीमध्ये लाडक्या बहिणींनी अजीतदादांना आधीच पराभूत केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील गद्दार दिसणार नाही,असेही शिवसेना नेते म्हणाले.

उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा काँग्रेसकडे आहे कामुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेपेक्षा चांगला चेहरा आहे का,असेल तर काँग्रेसने दाखवावा, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAurangabadऔरंगाबाद