शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

शहरांची नावे बदलून प्रश्न सुटत असतील तर आमचा पाठिंबा : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 18:39 IST

Nana Patole प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना टोला लगावला.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा सुभाष देसाई यांना टोला

औरंगाबाद: आमच्या दृष्टीने बेरोजगारी, महागाई, विषमता यासारखे महत्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सुटले पाहिजेत. नावे बदलून असे प्रश्न सुटत असतील तर नामांतराला आमचा पाठिंबा आहे. असा टोला आज येथे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)  यांनी औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांना लगावला. देसाई यांच्या हीच वेळ आहे संभाजीनगर नाव देण्याची या भूमिकेला पटोले यांनी छेद दिला. पत्रकारांशी वार्तालाप करीत असताना ते म्हणाले की, नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आल्यावर कोण काय मांडतो ते बघू. ( If changing the names of cities solves the problem, then our support! : Nana Patole) 

स्वातंत्र्याची लढाई लढून कॉंग्रेसने या देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त केले. आता मोदी विरुध्दची लढाई लढण्यास कॉंग्रेस सज्ज असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यांनी आरोप केला की, केंद्र सरकारचा संविधान व्यवस्थेवर विश्वास नाही. फाळणीदिन साजरा करण्याचे आवाहन करण्याची मनोवृत्ती कशाचे द्योतक आहे. पंतप्रधानच या देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपची भूमिका आरक्षण विरोधी आहे. रा.स्व. संघाची भूमिका हीच भाजपची भूमिका हे आता लपून राहिलेले नाही, असे ते म्हणाले.

प्रथम संविधान मग धर्म असे सांगत पटोले यांनी, कॉंग्रेसने जाती धर्माच्या पलिकडे जाऊन स्वातंत्र्याची लढाई लढवली. आताही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राजकारण करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSubhash Desaiसुभाष देसाईAurangabadऔरंगाबाद