शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कचरा टाकल्यास मनपा व्यापाऱ्यांना सरसकट दंड आकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 14:04 IST

मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

ठळक मुद्दे शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

औरंगाबाद : बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट आहे. विभागनिहाय कचरा निचरा करण्याच्या निर्णयानंतर मनपाकडून आता शहरातील कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. यातूनच मनपाने व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या कचऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचऱ्याच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

सोयीसाठी २ वेळा कचरा उचलण्यात येतोटिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाऱ्यांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.

दोन लाखाच्या दंडाचे टार्गेट शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत आहे. व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाऱ्यांनी शेवटी नमूद केले.

दंड लावणे हा उपाय नाही...व्यापाऱ्यांनी नेहमीच महापालिकेला सहकार्य केले आहे. औषधी भवन येथील व्यापारी आता कचरा कुंडीत किंवा रस्त्यावर टाकत नाहीत. सर्व कचरा एकत्र जमा करून मनपाच्या घंटागाडीकडे देतात. महापालिकेने अगोदर आपली यंत्रणा मजबूत करावी. सकाळी जेव्हा व्यापारी प्रतिष्ठाने उघडतात तेव्हा घंटागाडी फिरवावी. सायंकाळीही उशिरा एक रिक्षा या भागात आल्यास सर्व व्यापारी आपला कचरा त्याला देतील. मनपाने आपली यंत्रणाच मजबूत केलेली नाही. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा टाकण्यात कोणालाही आनंद होत नाही. मजबुरीने त्याला टाकावे लागते. व्यापाऱ्यांना, नागरिकांना दंड आकारून हा प्रश्न सुटणार नाही. - अजय शहा, माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नbusinessव्यवसायpaithan gateपैठण गेट