शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

रस्त्यावर कचरा टाकल्यास मनपा व्यापाऱ्यांना सरसकट दंड आकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 14:04 IST

मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

ठळक मुद्दे शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

औरंगाबाद : बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर दररोज रात्री शेकडो टन सुका कचरा पडून असतो. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात कचऱ्याची समस्या अत्यंत बिकट आहे. विभागनिहाय कचरा निचरा करण्याच्या निर्णयानंतर मनपाकडून आता शहरातील कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. यातूनच मनपाने व्यापाऱ्यांकडे होणाऱ्या कचऱ्याकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील कोणत्याही व्यापाऱ्याकडे कचरा साठविण्यासाठी डसबिन नाही. मनपाच्या वाहनांमध्ये कचरा टाकण्याचे सोडून व्यापारी खुशाल रात्री रस्त्यावर कचरा आणून टाकतात. कुंभारवाड्यात तर नागरिकही रस्त्यावरच कचऱ्याच्या कॅरिबॅग ठेवतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापाऱ्यांना सरसकट दंड लावण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. 

सोयीसाठी २ वेळा कचरा उचलण्यात येतोटिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, गोमटेश मार्केट आदी भागात रात्री १० नंतर कॅरिबॅग, कागदी पुठ्ठे, विविध मालांवरील पातळ कॅरिबॅग रस्त्यावर फेकून देण्यात येते. व्यापाऱ्यांनीच कचरा रस्त्यावर टाकल्यास शहर कसे स्वच्छ होईल, असा प्रश्न मनपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक दुकानदाराने सुका कचरा ठेवण्यासाठी डसबिन ठेवल्याच पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी मनपाच्या घंटागाडीकडे हा कचरा दिला पाहिजे. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी दोनवेळा कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही कचरा रस्त्यावर येत असेल तर ही फार गंभीर बाब असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी नमूद केले.

दोन लाखाच्या दंडाचे टार्गेट शहरात कचऱ्याची परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत महापालिका शहर सुंदर, स्वच्छ कसे राहील यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना खीळ बसविण्याचे काम व्यापाऱ्यांकडून होत आहे. व्यापाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रत्येक दुकानदाराला दोन हजार रुपये दंड आकारण्यात यावा, असा निर्णय महापौरांनी घेतला. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना स्वतंत्र पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने दररोज किमान दोन लाख रुपये दंड वसूल करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. निधी मनपाच्या तिजोरीत आला पाहिजे असेही पदाधिकाऱ्यांनी शेवटी नमूद केले.

दंड लावणे हा उपाय नाही...व्यापाऱ्यांनी नेहमीच महापालिकेला सहकार्य केले आहे. औषधी भवन येथील व्यापारी आता कचरा कुंडीत किंवा रस्त्यावर टाकत नाहीत. सर्व कचरा एकत्र जमा करून मनपाच्या घंटागाडीकडे देतात. महापालिकेने अगोदर आपली यंत्रणा मजबूत करावी. सकाळी जेव्हा व्यापारी प्रतिष्ठाने उघडतात तेव्हा घंटागाडी फिरवावी. सायंकाळीही उशिरा एक रिक्षा या भागात आल्यास सर्व व्यापारी आपला कचरा त्याला देतील. मनपाने आपली यंत्रणाच मजबूत केलेली नाही. रस्त्यावर किंवा कुठेही कचरा टाकण्यात कोणालाही आनंद होत नाही. मजबुरीने त्याला टाकावे लागते. व्यापाऱ्यांना, नागरिकांना दंड आकारून हा प्रश्न सुटणार नाही. - अजय शहा, माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघ

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नbusinessव्यवसायpaithan gateपैठण गेट