शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीचे भूमिपूजन झाले; मात्र मराठवाड्यातील इतर संस्थाना निधी कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 19:54 IST

घोषणा केलेल्या जालना, लातूर येथील पॉलिटेक्निकचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थांच्या निर्मितीसाठी अद्यापही कार्यवाही झालेली नाही.

ठळक मुद्दे ४ आक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणांची अद्याप पूर्तता नाही महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला बांधकामासाठी एकही रुपया मिळालेला नाही.

औरंगाबाद : ४ आक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेतील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घोषणा केलेल्या ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी (दि.४) जालन्याजवळील शिरसवाडी येथे झाले.  मात्र, याचवेळी घोषणा केलेल्या जालना, लातूर येथील पॉलिटेक्निकचे अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्थांच्या निर्मितीसाठी अद्यापही कार्यवाही झालेली नाही. तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला बांधकामासाठी एकही रुपया मिळालेला नाही. हा निधी देण्याची मागणी मराठवाड्यातील नागरिक करीत आहेत.

मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्राचा असलेला मागासपणा दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक संस्था सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, यातील ‘आयसीटी’ या संस्थेच्या उपकेंद्रासाठीच ३९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत संस्था कार्यान्वित केली. याचे उद््घाटन आज सकाळी ११.३० वाजता झाले. उर्वरित घोषणांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास आणि संशोधन संस्थेला १५० कोटी रुपयांपैकी एकही रुपया देण्यात आलेला नाही. 

विधी विद्यापीठाचा निधी कधी मिळणार तसेच मागील वर्षी सुरू झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या जागेचा, बांधकाम सुरू करण्याचा प्रश्न अद्यापही सोडविण्यात आलेला आहे. या विद्यापीठासाठी २३२ कोटी रुपयांचा बांधकाम प्लॅन राज्य सरकारला सादर केलेला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

महाविद्यालयांची मंजुरी प्रलंबित याचवेळी याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत जालना व लातूर जिल्ह्यात दोन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. त्यापैकी प्रत्येकी एका महाविद्यालयाची श्रेणी बदलून त्याचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी केवळ लातूरच्या पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा प्रस्ताव ‘एआयसीटी’कडे दाखल झालेला आहे. त्यावरही कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे सर्व प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती शासकीय अधिकाऱ्यांनी दिली. मराठवाड्यासाठी घोषित झालेल्या या संस्थांना निधी आणि मंजुरी देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

‘स्पा’ची घोषणा हवेतचमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१७ रोजी विधि विद्यापीठाच्या उद्घाटन कार्यक्रमात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ (स्पा) संस्थेची उभारणी लवकरच औरंगाबादेत होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाfundsनिधीState Governmentराज्य सरकारNational Law Universityनॅशनल लॉ युनिव्हर्सिटी