शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कृतार्थ मी... मी निष्ठेने काम केले व समाजाने मला खूप-खूप प्रेम दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:06 IST

मराठी सारस्वतातील एक रत्न पद्मश्री डॉ. युसूफखान महंमदखान पठाण ऊर्फ यु.म. पठाण हे सोमवारी (दि.९) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत.

ठळक मुद्दे मी जे काही केले त्याला मराठी जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला.कुठेही मला उपरेपणाचा, जातीवादाचा सामना करावा लागला नाही.

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : मराठीतील एक लेखक असले तरी हिंदी, इंग्रजी व फारशी वाङ्मयातील त्यांची मुक्त मुशाफिरी ही वादातीत. संत साहित्याचे अभ्यासक आणि भाष्यकार, लघुकथा लेखक, ललित लेख, व्यक्तिचित्रे आदी वाङ्मय प्रकारात दादा माणूस. तब्बल ७० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या संख्येएवढ्याच किंवा त्याहून अधिक पुरस्कारांनी त्यांना महाराष्ट्रासह, देश व विदेशातील विविध संस्था, सरकारांनी गौरविले आहे. फारशी भाषेला मराठीत आणणारे, महाराष्ट्रातील विविध धर्मसंप्रदायांचे चिकित्सक अभ्यासक, अवघा महाराष्ट्र पायाखाली घालून पाच हजारांहून अधिक प्राचीन हस्तलिखित पोथ्या जमा करणारे संग्राहक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा मराठी विभाग जागतिक स्तरावर नेणारे ज्ञानमहर्षी, हजारो विद्यार्थी घडविणारे गुरू, मराठी सारस्वतातील एक रत्न पद्मश्री डॉ. युसूफखान महंमदखान पठाण ऊर्फ यु.म. पठाण हे सोमवारी (दि.९) वयाची ९० वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. 

आई-वडील हेच माझी प्रेरणामाझे वडील बी.ए. होते. आई त्या काळात मॅट्रिकपर्यंत शिकलेली होती. आई करमाळ्याची होती. ती ग्रामीण मराठी खूूप चांगले बोलायची. मराठीवर त्यांचे प्रेम होते. मुळात आमचे सर्व घरच मराठी होते. त्यामुळे मी बालपणापासूनच मराठीकडे आकर्षित झालो. माझी मराठी चांगली असण्याचे कारण हे कुटुंबाकडून मला मिळालेले बाळकडू होय. माझे सर्व कुटुंबच सुशिक्षित होते. माझे आजोबा (आईचे वडील) डॉक्टर होते. 

गणित हा माझा कच्चा विषयमी शाळेला दांडी कधीच मारली नाही. मी खेळ फारसे खेळलोे नाही; परंतु सतत अभ्यास, लेखन व वाचन करायचो; पण गणित हा माझा सर्वात कच्चा विषय. त्या विषयात मला फार कमी मार्क मिळायचे. त्यामुळे वाईट वाटायचे. मग सुधारणा केली व गुण चांगले पडू लागले. १९४७ मध्ये मुंबई बोर्डामधून मी मॅट्रिक पास झालो. मॅट्रिकपूर्वीच मी लिहू लागलो होतो व ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’सारख्या प्रतिष्ठित मासिकांतून माझे लेखन प्रसिद्धही झाले होते.

माझ्या शिक्षकाचा मला अभिमान मला माझ्या शिक्षकांचा कायमच अभिमान वाटत आला आहे. साताऱ्याला असताना मला मो. रा. वाळिंबे हे शिक्षक होते. सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये असलेले माझे प्रिन्सिपल श्रीराम शर्मा हे इतिहासाचे मोठे अभ्यासक होते. तेथेच वि.म. कुलकर्णी यांच्यासोबत मी काम केले. माझ्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे.

मराठी समाजामुळे मी घडलोमी जे काही केले त्याला मराठी जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला. कुठेही मला उपरेपणाचा, जातीवादाचा सामना करावा लागला नाही. हे बाहेरचे, दुसऱ्या धर्माचे आहोत, असे मला कधीच जाणवले नाही किंवा कुणीही मला तसे वागवले नाही. मी संत साहित्याचा अभ्यास करतोय म्हणून कुणी मुस्लिम धर्मीयांनीही मला विरोध केला नाही. या सर्व धर्मीयांचेच माझ्यावर उपकार आहेत, असे मी मानतो.  

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद