शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:06 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे...

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील आणि सातारा, औंध संस्थानचे गॅझेटिअर लागू केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. ते छत्रपती संभाजीनगरातील खाजगी हॉस्पिटलमधून माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे. मराठ्यांचा थेट ओबीसीत समावेश झालेला नसला तरी थोडे थोडे खाल्ले तर काय बिघडले? शासन निर्णय जर चुकीचा असता तर छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी एवढा विरोध कशाला केला असता? छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले नसते. या निर्णयामुळे मराठा ओबीसीमध्ये समाविष्ट झाला आहे. कोणाच्या दाव्यावर विश्वास ठेवू नका.

काहींच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे पोटशूळ मराठा समाजातील काही अभ्यासकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे. ते चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत आहेत. त्यांच्याकडे गरजवंत मराठ्यांनी लक्ष देऊ नये.उपोषण सुरू झाले तेव्हाच समाजातील सगळ्या अभ्यासकांना बोलावले होते. जे आले नाहीत तेच आता बोलत आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजासाठी काय केले, असा सवाल करीत  मराठ्यांची डोके फुटण्याची त्यांना अपेक्षा होती.

ती अपेक्षा तर पूर्ण झालीच नाही. उलट  जल्लोषात गेले आणि जीआर घेऊन जल्लोषात परतले. हेच खरे दुखणे आहे. त्यामुळे समाजाने अशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaratha Reservationमराठा आरक्षण