शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होणार, मनोज जरांगे पाटील यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:06 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे...

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने हैदराबाद गॅझिटिअर लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्यातील आणि सातारा, औंध संस्थानचे गॅझेटिअर लागू केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्टीकरण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहे. ते छत्रपती संभाजीनगरातील खाजगी हॉस्पिटलमधून माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या निर्णयावर समाजातील अभ्यासकांकडून टीका करण्यात येत आहे. त्याविषयी जरांगे म्हणाले, शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना फायदा होणार आहे. मराठ्यांचा थेट ओबीसीत समावेश झालेला नसला तरी थोडे थोडे खाल्ले तर काय बिघडले? शासन निर्णय जर चुकीचा असता तर छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी एवढा विरोध कशाला केला असता? छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले नसते. या निर्णयामुळे मराठा ओबीसीमध्ये समाविष्ट झाला आहे. कोणाच्या दाव्यावर विश्वास ठेवू नका.

काहींच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे पोटशूळ मराठा समाजातील काही अभ्यासकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला आहे. ते चुकीच्या पद्धतीने मांडणी करीत आहेत. त्यांच्याकडे गरजवंत मराठ्यांनी लक्ष देऊ नये.उपोषण सुरू झाले तेव्हाच समाजातील सगळ्या अभ्यासकांना बोलावले होते. जे आले नाहीत तेच आता बोलत आहेत. आतापर्यंत त्यांनी समाजासाठी काय केले, असा सवाल करीत  मराठ्यांची डोके फुटण्याची त्यांना अपेक्षा होती.

ती अपेक्षा तर पूर्ण झालीच नाही. उलट  जल्लोषात गेले आणि जीआर घेऊन जल्लोषात परतले. हेच खरे दुखणे आहे. त्यामुळे समाजाने अशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMaratha Reservationमराठा आरक्षण