शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

Marathawada Muktisangram Din : मराठवाड्याचा अनुशेष एक यक्षप्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 12:12 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत मराठवाड्याच्या नशिबी विकासाबाबत उपेक्षाच आली आहे. काही लाख कोटींवर या विभागाचा अनुशेष पोहोचला आहे. हा अनुशेष कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाढतच आहे. अनुशेषाचा प्रश्न सोडविल्याशिवाय महाराष्ट्र विकसित राज्य होणे नाही.

डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी खासदार

15 आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, परंतु निजामाच्या जोखडातून सुमारे १ वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.भाषिक एकात्मतेसाठी विदर्भ व मराठवाड्याने महाराष्ट्रात सामील होण्याचे ठरविले़ १९५३ ला नागपूर करार झाला़ मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला लोकसंख्येच्या प्रमाणात विकास क्षेत्रात न्याय मिळावा या दृष्टीने या करारात तरतूद होती़ विदर्भातील नेत्यांच्या रेट्यामुळे नागपूर कराराला घटनात्मक संरक्षण मिळावे म्हणून घटनेत कलम ३७१ (२) हे कलम १९५६ साली अंतर्भूत करण्यात आले़ विदर्भ व मराठवाडा या मागासलेल्या विभागांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असे स्पष्ट आश्वासन १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी विधिमंडळात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिले़ गेल्या ६ दशकांच्या विकासाचा आलेख पाहिला तर हे आश्वासन पाळले गेले असे दिसत नाही़ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या विभागातील विकासाचा असमतोल वाढत गेला आहे़ पश्चिम महाराष्ट्रातील धुरंधर नेत्यांनी विकासनिधी आपल्याच भागाकडे खेचून नेला व त्यामुळे मराठवाड्यातील अनुशेष वाढत चालला आहे. १९८३ साली अर्थशास्त्रज्ञ दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली़ १९८४ साली दांडेकर समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला़ तेव्हा कुठे मराठवाडा व विदर्भाच्या अनुशेषाला खऱ्या अर्थाने वाचा फुटली़ समितीने उद्योग, शिक्षण, रोजगार, दळणवळण, सिंचन इत्यादी क्षेत्रातील अनुशेष (शास्त्रशुद्ध पद्धतीने विकासाचे मापदंड ठरवून) काढला व तो भरून काढण्यासाठी उपायही सुचविले.

 शासनाने काही जुजबी तरतुदी केल्या़; परंतु मूळ शिफारशींकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे हा अनुशेष वाढत गेला. सत्यशोधन समितीने १९८४ साली काढलेला अनुशेष ३१८६ कोटी रुपये एवढा होता. तो अनुशेष व निर्देशांकच अनुशेष समितीच्या अहवालाप्रमाणे १९९४ साली १५३५५ कोटी रुपये एवढा निघाला. दांडेकर समितीच्या शिफारशी डावलून १९८५ ते २००३-०४ या १९ वर्षांत विकास योजनेत हक्काची १४०५०़९३ कोटींची तरतूद असताना १०७४५़८१ कोटी एवढाच खर्च केला गेला़ २००४-०५ या वर्षात अनुशेष दूर करण्यासाठी नियोजित केलेल्या रकमेच्या ८़४ टक्के एवढाच खर्च केला व उरलेली रक्कम पश्चिम महाराष्ट्राकडे वळविली़ १ एप्रिल १९९४ रोजीचा वित्तीय अनुशेष २००१ नंतर राज्यपालांनी निदेश देऊन हा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला़ २०११ मध्ये हा अनुशेष भरून निघाला असा शासनाचा दावा आहे़; मात्र १९९४ नंतर आजतागायत निर्माण झालेल्या अनुशेषाचे काय? हा प्रश्न कायम राहतोच.

‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा’ असे अभिमानाने म्हणावयाचे तर अनुशेषाचा यक्ष प्रश्न सोडवावाच लागेल.

आजपर्यंत मराठवाड्याला काय मिळाले यावर चर्चा करण्यापेक्षा आगामी काळात मराठवाड्याच्या विकासासाठी काय केले पाहिजे याची चर्चा करणे अधिक संयुक्तिक ठरेल. दुष्काळमुक्ती लढाईची सुरुवात सर्वप्रथम करावी लागणार आहे.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

 

 

 

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडा