शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सेव्हन हिलवर सातव्यांदा हटविल्या झोपड्या; शेवटचा ‘वरवंटा’ फिरविल्याचा मनपाचा दावा

By मुजीब देवणीकर | Updated: December 28, 2023 12:33 IST

अतिक्रमणधारकांनी काही दिवस थांबा, अशी विनंती केली होती. स्वत:हून अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी कारवाई करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिलपर्यंत मागील २५ वर्षांपासून दगडी पाटा-वरवंटा विक्रेत्यांनी अतिक्रमण करून छोट्या-छोट्या झोपड्या बांधल्या होत्या. महापालिकेने यापूर्वी सहा वेळेस या झोपड्या हटविल्या होत्या. बुधवारी मोठ्या ताकदीने महापालिकेने सर्व झोपड्यांवर सातव्यांदा कारवाई केली. हा शेवटचा वरवंटा होता. यापुढे झोपड्या अजिबात दिसणार नाहीत, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला. दिवसभरात एकूण २५ जणांवर कारवाई केली.

खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने पोलिसांच्या मदतीने मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे. सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी २४ तास वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा कारवाई केली. दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण होत होते. काही महिन्यांपूर्वी दसऱ्याला कारवाई करण्याचा मनपाने प्रयत्न केला होता.

अतिक्रमणधारकांनी काही दिवस थांबा, अशी विनंती केली होती. स्वत:हून अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी कारवाई करण्यात आली. १७ झोपड्यांमध्ये पाटा-वरवंटा विक्रीचा व्यवसाय सुरू होता. ५ जणांना फुलझाडे विक्रीची दुकाने सुरू केली होती. अन्य तीन जणांनी छोटी अतिक्रमणे केली होती. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक संदीप राठोड यांच्या सहकार्याने वॉर्ड अधिकारी प्रसाद देशपांडे, निरीक्षक सय्यद जमशेद आदींनी केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका