शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हुश्श... नाथसागर मृतसाठ्यातून पोहोचला जिवंत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:16 IST

नाशिक क्षेत्रातून ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

ठळक मुद्दे२२ मार्चपासून गेला मृतसाठ्यातसध्या १.०५ टक्का जलसाठा

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने सायंकाळी बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान १४९५.०१ फुटांची पातळी ओलांडताच जायकवाडीचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. २२ मार्चपासून मृतसाठ्यात असलेले धरण जिवंत साठ्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जायकवाडी धरणात सायंकाळी चार वाजता १.०५% जलसाठा झाला होता. धरणात ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नाशिक ३७ मि.मी., त्र्यंबकेश्वर ७९ मि.मी., इगतपुरी १३४ मि.मी., घोटी ९७ मि.मी., गंगापूर १०६ मि.मी., कश्यपी ५१ मि.मी., कडवा ४६ मि.मी., दारणा ७० मि.मी., भावली १२७ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने तेथील धरण समूहातील बहुतेक धरणांनी प्रचलन आराखड्यातील पाणीपातळी ओलांडल्याने त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, सोडलेले पाणी जायकवाडीला प्राप्त होत आहे. 

बुधवारी (दि.३१) दुपारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ५३१० क्युसेक, दारणा धरणातून १३०५८ क्युसेक, पालखेड धरणातून १५२२ क्युसेक, कडवा धरणातून ७०५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. या सर्व धरणाचा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ४६९८३ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीनदीला गत चार दिवसांपासून आलेला पूर कायम असून जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी धरणाची पाणीपातळी १४९४.५० फुटांपेक्षा खाली गेल्याने धरण मृतसाठ्यात गेले होते. २२ मार्च ते ३१ जुलैदरम्यान चार महिने औरंगाबाद, जालना, पाथर्डी, शेवगाव आदींसह शेकडो गावांची तहान मृतसाठ्यातून भागविली गेली. जवळपास २३८ द.ल.घ.मी. (८.४२ टी.एम.सी.) पाण्याचा वापर मृतसाठ्यातून करण्यात आला.दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १४९५.०१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा ७६०.९४९ द.ल.घ.मी. (२६ टी.एम.सी.) झाला असून, यापैकी २२.७४३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. १ जून २०१९ पासून धरणात २३८.४९६ द.ल.घ.मी.ची आवक झाली आहे.

जलविद्युत प्रकल्प सुरू होणारधरण जिवंत साठ्यात आल्याने १ आॅगस्टपासून धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने मार्च महिन्यापासून बंद असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे टर्बाईन उद्या सकाळी ९ वा. पुन्हा फिरणार आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर गोदावरीत पाणी सुटत असल्याने कुणीही गोदावरी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे .

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgangapur damगंगापूर धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊस