शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

हुश्श... नाथसागर मृतसाठ्यातून पोहोचला जिवंत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:16 IST

नाशिक क्षेत्रातून ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

ठळक मुद्दे२२ मार्चपासून गेला मृतसाठ्यातसध्या १.०५ टक्का जलसाठा

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने सायंकाळी बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान १४९५.०१ फुटांची पातळी ओलांडताच जायकवाडीचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. २२ मार्चपासून मृतसाठ्यात असलेले धरण जिवंत साठ्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जायकवाडी धरणात सायंकाळी चार वाजता १.०५% जलसाठा झाला होता. धरणात ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नाशिक ३७ मि.मी., त्र्यंबकेश्वर ७९ मि.मी., इगतपुरी १३४ मि.मी., घोटी ९७ मि.मी., गंगापूर १०६ मि.मी., कश्यपी ५१ मि.मी., कडवा ४६ मि.मी., दारणा ७० मि.मी., भावली १२७ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने तेथील धरण समूहातील बहुतेक धरणांनी प्रचलन आराखड्यातील पाणीपातळी ओलांडल्याने त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, सोडलेले पाणी जायकवाडीला प्राप्त होत आहे. 

बुधवारी (दि.३१) दुपारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ५३१० क्युसेक, दारणा धरणातून १३०५८ क्युसेक, पालखेड धरणातून १५२२ क्युसेक, कडवा धरणातून ७०५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. या सर्व धरणाचा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ४६९८३ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीनदीला गत चार दिवसांपासून आलेला पूर कायम असून जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी धरणाची पाणीपातळी १४९४.५० फुटांपेक्षा खाली गेल्याने धरण मृतसाठ्यात गेले होते. २२ मार्च ते ३१ जुलैदरम्यान चार महिने औरंगाबाद, जालना, पाथर्डी, शेवगाव आदींसह शेकडो गावांची तहान मृतसाठ्यातून भागविली गेली. जवळपास २३८ द.ल.घ.मी. (८.४२ टी.एम.सी.) पाण्याचा वापर मृतसाठ्यातून करण्यात आला.दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १४९५.०१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा ७६०.९४९ द.ल.घ.मी. (२६ टी.एम.सी.) झाला असून, यापैकी २२.७४३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. १ जून २०१९ पासून धरणात २३८.४९६ द.ल.घ.मी.ची आवक झाली आहे.

जलविद्युत प्रकल्प सुरू होणारधरण जिवंत साठ्यात आल्याने १ आॅगस्टपासून धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने मार्च महिन्यापासून बंद असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे टर्बाईन उद्या सकाळी ९ वा. पुन्हा फिरणार आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर गोदावरीत पाणी सुटत असल्याने कुणीही गोदावरी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे .

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgangapur damगंगापूर धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊस