शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

हुश्श... नाथसागर मृतसाठ्यातून पोहोचला जिवंत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:16 IST

नाशिक क्षेत्रातून ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

ठळक मुद्दे२२ मार्चपासून गेला मृतसाठ्यातसध्या १.०५ टक्का जलसाठा

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने सायंकाळी बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान १४९५.०१ फुटांची पातळी ओलांडताच जायकवाडीचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. २२ मार्चपासून मृतसाठ्यात असलेले धरण जिवंत साठ्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जायकवाडी धरणात सायंकाळी चार वाजता १.०५% जलसाठा झाला होता. धरणात ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नाशिक ३७ मि.मी., त्र्यंबकेश्वर ७९ मि.मी., इगतपुरी १३४ मि.मी., घोटी ९७ मि.मी., गंगापूर १०६ मि.मी., कश्यपी ५१ मि.मी., कडवा ४६ मि.मी., दारणा ७० मि.मी., भावली १२७ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने तेथील धरण समूहातील बहुतेक धरणांनी प्रचलन आराखड्यातील पाणीपातळी ओलांडल्याने त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, सोडलेले पाणी जायकवाडीला प्राप्त होत आहे. 

बुधवारी (दि.३१) दुपारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ५३१० क्युसेक, दारणा धरणातून १३०५८ क्युसेक, पालखेड धरणातून १५२२ क्युसेक, कडवा धरणातून ७०५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. या सर्व धरणाचा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ४६९८३ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीनदीला गत चार दिवसांपासून आलेला पूर कायम असून जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी धरणाची पाणीपातळी १४९४.५० फुटांपेक्षा खाली गेल्याने धरण मृतसाठ्यात गेले होते. २२ मार्च ते ३१ जुलैदरम्यान चार महिने औरंगाबाद, जालना, पाथर्डी, शेवगाव आदींसह शेकडो गावांची तहान मृतसाठ्यातून भागविली गेली. जवळपास २३८ द.ल.घ.मी. (८.४२ टी.एम.सी.) पाण्याचा वापर मृतसाठ्यातून करण्यात आला.दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १४९५.०१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा ७६०.९४९ द.ल.घ.मी. (२६ टी.एम.सी.) झाला असून, यापैकी २२.७४३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. १ जून २०१९ पासून धरणात २३८.४९६ द.ल.घ.मी.ची आवक झाली आहे.

जलविद्युत प्रकल्प सुरू होणारधरण जिवंत साठ्यात आल्याने १ आॅगस्टपासून धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने मार्च महिन्यापासून बंद असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे टर्बाईन उद्या सकाळी ९ वा. पुन्हा फिरणार आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर गोदावरीत पाणी सुटत असल्याने कुणीही गोदावरी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे .

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgangapur damगंगापूर धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊस