शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

हुश्श... नाथसागर मृतसाठ्यातून पोहोचला जिवंत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 15:16 IST

नाशिक क्षेत्रातून ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू

ठळक मुद्दे२२ मार्चपासून गेला मृतसाठ्यातसध्या १.०५ टक्का जलसाठा

पैठण (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीने सायंकाळी बुधवारी ४ वाजेच्या दरम्यान १४९५.०१ फुटांची पातळी ओलांडताच जायकवाडीचा जलसाठा मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात आला आहे. २२ मार्चपासून मृतसाठ्यात असलेले धरण जिवंत साठ्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. जायकवाडी धरणात सायंकाळी चार वाजता १.०५% जलसाठा झाला होता. धरणात ४५०८२ क्युसेक क्षमतेने आवक सुरू असल्याने जलसाठ्यात मोठी वाढ अपेक्षित आहे.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत नाशिक ३७ मि.मी., त्र्यंबकेश्वर ७९ मि.मी., इगतपुरी १३४ मि.मी., घोटी ९७ मि.मी., गंगापूर १०६ मि.मी., कश्यपी ५१ मि.मी., कडवा ४६ मि.मी., दारणा ७० मि.मी., भावली १२७ मि.मी., अशा पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असल्याने तेथील धरण समूहातील बहुतेक धरणांनी प्रचलन आराखड्यातील पाणीपातळी ओलांडल्याने त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, सोडलेले पाणी जायकवाडीला प्राप्त होत आहे. 

बुधवारी (दि.३१) दुपारी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून ५३१० क्युसेक, दारणा धरणातून १३०५८ क्युसेक, पालखेड धरणातून १५२२ क्युसेक, कडवा धरणातून ७०५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. या सर्व धरणाचा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ४६९८३ क्युसेक क्षमतेने गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीनदीला गत चार दिवसांपासून आलेला पूर कायम असून जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ मार्च रोजी धरणाची पाणीपातळी १४९४.५० फुटांपेक्षा खाली गेल्याने धरण मृतसाठ्यात गेले होते. २२ मार्च ते ३१ जुलैदरम्यान चार महिने औरंगाबाद, जालना, पाथर्डी, शेवगाव आदींसह शेकडो गावांची तहान मृतसाठ्यातून भागविली गेली. जवळपास २३८ द.ल.घ.मी. (८.४२ टी.एम.सी.) पाण्याचा वापर मृतसाठ्यातून करण्यात आला.दरम्यान, बुधवारी रात्री ८ वाजता धरणाची पाणीपातळी १४९५.०१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा ७६०.९४९ द.ल.घ.मी. (२६ टी.एम.सी.) झाला असून, यापैकी २२.७४३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे. १ जून २०१९ पासून धरणात २३८.४९६ द.ल.घ.मी.ची आवक झाली आहे.

जलविद्युत प्रकल्प सुरू होणारधरण जिवंत साठ्यात आल्याने १ आॅगस्टपासून धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पाणीपातळी मृतसाठ्यात गेल्याने मार्च महिन्यापासून बंद असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे टर्बाईन उद्या सकाळी ९ वा. पुन्हा फिरणार आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर गोदावरीत पाणी सुटत असल्याने कुणीही गोदावरी नदीपात्रात उतरू नये, जनावरे, वाहने किंवा कोणतीही मालमत्ता नदीपात्रात राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे .

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgangapur damगंगापूर धरणnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरRainपाऊस