लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या इशाºयानुसार, शहराला शनिवारी सायंकाळी वादळी वा-याचा तडाखा बसला. वादळी वाºयाच्या लाटा जणू गगनाला स्पर्श करीत होत्या, असा भास होत होता. अवघे १० मिनिटे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. जालना रोडवर तर धुळीमुळे समोरचे वाहन दिसेनासे झाले होते.शहरात लावलेले मोठे होर्डिंग फाटून हवेत उडू लागले होते. शहरातील विविध भागांत असंख्य झाडे कोलमडून पडली होती.चैैत्राच्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असताना अचानक शनिवारी दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि सायंकाळी पावणेपाच वाजेदरम्यान अचानक वादळी वा-याने शहराला घेरले. चिकलठाणा, रामनगर, संजयनगरच्या पाठीमागून वादळ उठले आणि आकाशापर्यंत धुळीच्या लाटा उठल्या.
औरंगाबाद शहराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:19 IST
भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या इशाºयानुसार, शहराला शनिवारी सायंकाळी वादळी वाºयाचा तडाखा बसला. वादळी वा-याच्या लाटा जणू गगनाला स्पर्श करीत होत्या, असा भास होत होता. अवघे १० मिनिटे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते. जालना रोडवर तर धुळीमुळे समोरचे वाहन दिसेनासे झाले होते.
औरंगाबाद शहराला वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा
ठळक मुद्देअनेक झाडे कोसळली : शनिवारी सायंकाळी २० मिनिटे धुळीचे साम्राज्य, होर्डिंग फाटले