शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

गावी जाण्याचे त्रांगडे कायम; ई-पास मिळविण्यात २० हजार नागरिक नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 19:45 IST

पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त झाले परप्रांतीय कामगारांचे ३९ हजार ५९१ अर्ज

ठळक मुद्दे२० हजार ४३८ अर्ज बाद करण्यात आले आहेत.१५ हजार ५०६ अर्जदारांना बाहेरगावी जाण्याचा ई-पास दिलाविविध जिल्ह्यांनी  नाकारला नागरिकांना प्रवेश 

औरंगाबाद : बाहेरगावी जाण्यासाठी आॅनलाईन ई-पास मिळविण्यासाठी तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाले. यापैकी सुमारे  २० हजार ४३८ नागरिकांना  अर्जातील त्रुटींमुळे ई-पास नाकारण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ मार्चपासून  लॉकडाऊन सुरू आहे. नोकरी, धंदा आणि शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात आलेले हजारो नागरिक अडकून पडले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ मेपासून औरंगाबाद शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना आॅनलाईन आणि आॅफलाईन  अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने उपलब्ध केलेल्या ई-मेलवर आजपर्यंत ३९ हजार ५१५  आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. आॅनलाईन अर्ज सादर करताना नियमावलीनुसार शारीरिकदृष्ट्या प्रवासासाठी तंदुरुस्त आहे  आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडणे, ज्या वाहनाने प्रवास करणार आहात  त्याचा नोंदणी क्रमांक, शिवाय प्रवाशांचे आधारकार्ड जोडणे गरजेचे आहे. 

औरंगाबाद शहरात आणि औद्योगिक वसाहतीत हजारो परप्रांतीय कामगार, मजूर कार्यरत आहेत. ही मंडळीही आता त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाईन अर्ज करीत आहेत. ग्रुप लीडरमार्फत त्यांना अर्ज सादर करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर सर्वांचे स्वतंत्र वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सादर करण्याऐवजी सर्वांची नावे असलेले एकच प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आॅनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध झाल्यापासून आजपर्यंत तब्बल ३९ हजार ५१५ अर्ज पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले. सुमारे ८० ते ९० हजार नागरिकांचे हे एकत्रित अर्ज आहेत. एका अर्जावर ५० ते ६० लोकांचा ग्रुप आहे. अर्जातील  चुका आणि त्रुटींमुळे निम्म्याहून अधिक अर्थात २० हजार ४३८ अर्ज बाद करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने आजपर्यंत १५ हजार ५०६ अर्जदारांना बाहेरगावी जाण्याचा ई-पास दिला आहे.

विविध जिल्ह्यांनी  नाकारला नागरिकांना प्रवेश राज्यातील नवी मुंबई, लातूर, ठाणे, परभणी, सोलापूर आणि पिंपरी चिंचवड आदी जिल्हा प्रशासनाने पत्र पाठवून रेड झोनमधील नागरिक, कोविड-१९ ची लक्षणे असलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. .......

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस