शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चौकाची रचना बिघडल्यामुळे स्टेशन चौकात वाहतुकीचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 19:19 IST

हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे.

औरंगाबाद : हजारो प्रवासी, पर्यटकांची आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वेस्टेशन चौकात सध्या दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतो आहे. एकीकडे चौकाची रचनाच बिघडून गेली आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त होत आहेत. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज २४ रेल्वेंची ये-जा होते. त्यामुळे हजारो प्रवासी, पर्यटकांची ये-जा होते. रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करण्यासाठी वेगवेगळे दोन स्वतंत्र दरवाजे आहेत. रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडण्याच्या गेटसमोर हा चौक आहे. हा गेट वनवे असून तेथून रेल्वेस्टेशनमध्ये वाहने नेण्यास बंदी आहे.

छावणी, मध्यवर्ती बसस्थानक, पैठण रोडकडून येणाऱ्या वाहनांना साधारणत: ५० मीटरचा वळसा घालून रेल्वेस्टेशनमध्ये जावे लागते. हे अंतर टाळण्यासाठी वाहनचालक थेट चौकातील (नो एंट्री) मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये घुसतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारी आणि आतमध्ये जाणारी वाहने समोरासमोर येतात आणि वाहतूक जाम होते.

कोकणवाडी रस्त्याकडून पैठण रोडकडे जाणारे अनेक वाहनचालक चौकात वाहतूक सिग्नल लागलेले असतानाही वाहन पुढे नेतात, तर पैठण रोडकडून येणारे आणि रेल्वेस्टेशनमध्ये जाणारे वाहनचालकही नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करतात. यातूनही कोंडीत भर पडते. चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी याठिकाणी वाहतूक पोलीस असतात; परंतु ते केवळ बघ्याचीच भूमिका घेतात. सिग्नल तोडणारे, बाहेर पडणाऱ्या मार्गातून रेल्वेस्टेशनमध्ये प्रवेश करणारे आणि रस्त्यावरच रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कारवाई होत नाही.

पर्यटकांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शनचौकाच्या या अवस्थेमुळे रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडणारे, पर्यटक आणि प्रवाशांना बेशिस्त वाहतुकीचे दर्शन प्रारंभीच घडते. त्याविषयी अनेक जण नाराजी व्यक्त करतात; परंतु वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन