शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:31 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करतील, असा विश्वास

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. ठाकरे यांनी वारंवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास असून ठाकरे तो शब्द पाळतील, असे वाटते आहे. 

शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व काही कार्यकर्त्यांनी देखील बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणाऱ्या सरकारकडून त्यांनाही अपेक्षा आहेत. शिवाय ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषविले जाणार आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येईल, यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येईल. सिल्लोड, पैठण, फुलंब्रीतील शेतकऱ्यांनी स्वत:हून मुंबईला शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तयारी केली. उत्स्फूर्तपणे ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. 

आ. भुमरे, आ. सत्तार यांचे नाव चर्चेत जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैठणचे आ.संदीपान भुमरे यांचे नाव मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत आघाडीवर आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आ.अब्दुल सत्तार हे लॉबिंग करीत आहेत. इतर कुणाचेही नाव मंत्रिमंडळासाठी चर्चेत नाही. शपथविधी सोहळ्यात महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे दोन आमदार शपथ घेणार आहेत. ३ डिसेंबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील सर्व घटक पक्षांतील मंत्र्यांची नावे समोर येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पालकमंत्री मुंबईचाच असणार?औरंगाबादला पालकमंत्री मुंबईतूनच नेमण्यात येईल. ठाकरे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर पालकमंत्री नेमण्याबाबत आघाडीची संयुक्त बैठक होऊन निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. मागील पाच वर्षांत जिल्ह्याला जे पालकमंत्री मिळाले, ते सर्व मुंबईचेच होते. रामदास कदम, डॉ. दीपक सावंत आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही पालकमंत्री मुंबईचेच होते. यावेळीदेखील पालकमंत्री मुंबईचाच असेल, असे बोलले जात आहे. 

औरंगाबाद सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक शपथविधीला रवानाउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमाला औरंगाबाद शहरातील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.  महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मुंबईला बुधवारी रात्रीच रवाना झाले. अनेक जण गुरुवारी सकाळी मुंबईकडे निघणार आहेत.मागील एक महिन्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोट बांधली. मुख्यमंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनेक जण बुधवारी सायंकाळी रवाना झाले. काही जण उद्या सकाळी वाहनाने निघणार आहेत. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले होते. २००० पर्यंत हे सरकार होते. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आनंदी आहेत. शपथविधी सोहळ्याला न जाणारे कार्यकर्ते शहरातच थांबून जल्लोष साजरा करणार आहेत. जल्लोषात काँग्रेस-राष्टÑवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसFarmerशेतकरी