शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 17:31 IST

शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करतील, असा विश्वास

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवारी शिवतीर्थावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. ठाकरे यांनी वारंवार शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्त होतील, असा विश्वास असून ठाकरे तो शब्द पाळतील, असे वाटते आहे. 

शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी व काही कार्यकर्त्यांनी देखील बुधवारी सायंकाळी मुंबईकडे प्रस्थान केले. शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण असून, येणाऱ्या सरकारकडून त्यांनाही अपेक्षा आहेत. शिवाय ठाकरे कुटुंबियातून पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद भूषविले जाणार आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता येईल, यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येईल. सिल्लोड, पैठण, फुलंब्रीतील शेतकऱ्यांनी स्वत:हून मुंबईला शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तयारी केली. उत्स्फूर्तपणे ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. 

आ. भुमरे, आ. सत्तार यांचे नाव चर्चेत जिल्ह्यात शिवसेनेचे सात आमदार आहेत. त्यापैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पैठणचे आ.संदीपान भुमरे यांचे नाव मंत्रिमंडळात वर्णी लागण्याबाबत आघाडीवर आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यामार्फत आ.अब्दुल सत्तार हे लॉबिंग करीत आहेत. इतर कुणाचेही नाव मंत्रिमंडळासाठी चर्चेत नाही. शपथविधी सोहळ्यात महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे दोन आमदार शपथ घेणार आहेत. ३ डिसेंबरनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील सर्व घटक पक्षांतील मंत्र्यांची नावे समोर येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

पालकमंत्री मुंबईचाच असणार?औरंगाबादला पालकमंत्री मुंबईतूनच नेमण्यात येईल. ठाकरे यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर पालकमंत्री नेमण्याबाबत आघाडीची संयुक्त बैठक होऊन निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजले. मागील पाच वर्षांत जिल्ह्याला जे पालकमंत्री मिळाले, ते सर्व मुंबईचेच होते. रामदास कदम, डॉ. दीपक सावंत आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही पालकमंत्री मुंबईचेच होते. यावेळीदेखील पालकमंत्री मुंबईचाच असेल, असे बोलले जात आहे. 

औरंगाबाद सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक शपथविधीला रवानाउद्धव ठाकरे यांच्या शपथविधी कार्यक्रमाला औरंगाबाद शहरातील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी तसेच महापालिकेतील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत.  महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मुंबईला बुधवारी रात्रीच रवाना झाले. अनेक जण गुरुवारी सकाळी मुंबईकडे निघणार आहेत.मागील एक महिन्यापासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोट बांधली. मुख्यमंत्री म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा आयोजित केला आहे. औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अनेक जण बुधवारी सायंकाळी रवाना झाले. काही जण उद्या सकाळी वाहनाने निघणार आहेत. १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले होते. २००० पर्यंत हे सरकार होते. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड आनंदी आहेत. शपथविधी सोहळ्याला न जाणारे कार्यकर्ते शहरातच थांबून जल्लोष साजरा करणार आहेत. जल्लोषात काँग्रेस-राष्टÑवादीचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसFarmerशेतकरी