शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरात उन्हाळी कापूस

By admin | Updated: June 16, 2014 00:25 IST

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधार मृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे.

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधारमृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे. पावसाचा मागमूस नसल्याने सुमारे १०० एकरवरील कापसाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चालू असल्याचे चित्र आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले. संततधार व रिमझिम पावसाने शेत दलदलीत अडकले. पिकापेक्षा तणकट अधिक वाढले. त्यातच सोयाबीन-कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. रानटी जनावरांनी पिकांची नासधूस केली. पिकांचे निसर्ग लहरीने योग्य पोषण झाले नाही. पिकांचा अपेक्षित उतारा आला नाही. नगदी पिकाला आता सारखा भाव मोसमात मिळाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातून श्ेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित काही लागले नाही. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असल्याने अपेक्षेने शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे मोर्चा वळविला.रबी हंगामातील गव्हाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. शिवारात गहू बहरल्याने चेहऱ्यावर आनंद तरळू लागला. अपेक्षेपेक्षा जास्त उतारा येण्याची अपेक्षा बळावली. परंतु हे निसर्गाच्या अवकृपेने शक्य झाले नाही. जवळपास ६० गावात मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. गहू, संत्री, मोसंबी, केळीचे मोठे नुकसान झाले. अपेक्षेवर निसर्गाने पाणी फिरविले.तुटपुंजे अनुदान कुचकामी ठरले. नुकसानीचे पंचनामे करताना योग्य पद्धतीने झाले नाहीत. अशा तक्रारीचा ओघ गावागावांतून सुरू झाला. खरीप व रबीतील अनुभव सुखद नसतानाही शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने २०१४ च्या खरीप हंगामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली परंतु मान्सून अद्याप पोहोचला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीचा कटू अनुभव बाजूला सारत श्ेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पांढरे सोने जमिनीत टाकले. मोठ्या आशेने लागवड केलेल्या कापसाची मशागत करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. भारनियमनाची कटकट, पावसाची उघडीप सरत आलेला जलसाठा आदीने शेतकरी चिंतेत आहे. काहींना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे निसर्ग पावसाकडे डोळे आशाळभूत नजरेने कोरडेठक पडले आहेत. वाखरड, वाखरडवाडी, जंगमवाडी, बिजेवाडी, बहाद्दरपुरा, फुलवळ, पिंपळ्याचीवाडी, मुंडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. कंधार शहर व परिसरात ११ जून रोजी २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. परंतु पेठवडज, कुरुळा, उस्माननगर, फुलवळ, बारुळ गावासह परिसराकडे अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उन्हाळी कापसाला जगविण्याचा प्रश्न जिकिरीचा झाला असून शेतकऱ्यांना मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.गत खरीप व रबी हंगामाला निसर्ग लहरीपणाचा फटका बसला. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. बी-बियाणाचा, सालगड्याचा,मशागतीचा खर्च निघणे अवघड झाले. नव्या आशेने अनेकांनी उन्हाळी कापसाची लागवड केली. परंतु निसर्गाला शेतकऱ्याची कीव यावी, अशीच अपेक्षा कंधार तालुक्यातील पिंपळ्याची वाडी येथील शेतकरी विठ्ठल मुंडे यांनी व्यक्त केली़ पहिल्याच पावसात जीवित हानी शेतकरी पावसाची प्रतीक्षेत असताना १३ जून रोजी पावसाच्या हजेरीपेक्षा विजांचा कडकडाट अधिक होता. गऊळ येथील एक व ब्रम्हवाडी येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला. गरीब कुटुंबावर निसर्गाने आघात केला. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मृत्यू पावलेल्या व जखमींना तात्काळ मदत देण्याची गरज आहे. प्रशासन याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. १३ जून रोजी झालेला पाऊस उन्हाळी कापसाला अल्प ठरला. फुलवळ ३ मि.मी., कुरुळा-२ मि.मी, उस्माननगर-४०, बारुळ ३० व कंधार १२ मि.मी. झाला. पेठवडज पुन्हा निरंक राहिले.