शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शेकडो एकरात उन्हाळी कापूस

By admin | Updated: June 16, 2014 00:25 IST

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधार मृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे.

प्रा़ गंगाधर तोगरे, कंधारमृग मृग नक्षत्र कोरडे गेले. मान्सून उशीर करत असल्याने उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या श्ेतकऱ्यांची पाण्यासाठी कासावीस होत आहे. पावसाचा मागमूस नसल्याने सुमारे १०० एकरवरील कापसाला जगविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चालू असल्याचे चित्र आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले. संततधार व रिमझिम पावसाने शेत दलदलीत अडकले. पिकापेक्षा तणकट अधिक वाढले. त्यातच सोयाबीन-कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाला. रानटी जनावरांनी पिकांची नासधूस केली. पिकांचे निसर्ग लहरीने योग्य पोषण झाले नाही. पिकांचा अपेक्षित उतारा आला नाही. नगदी पिकाला आता सारखा भाव मोसमात मिळाला नाही. त्यामुळे खरीप हंगामातून श्ेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित काही लागले नाही. त्यामुळे जलसाठा उपलब्ध असल्याने अपेक्षेने शेतकऱ्यांनी रबी हंगामाकडे मोर्चा वळविला.रबी हंगामातील गव्हाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. शिवारात गहू बहरल्याने चेहऱ्यावर आनंद तरळू लागला. अपेक्षेपेक्षा जास्त उतारा येण्याची अपेक्षा बळावली. परंतु हे निसर्गाच्या अवकृपेने शक्य झाले नाही. जवळपास ६० गावात मार्चच्या पहिल्या आठवड्यात गारपीट झाली. गहू, संत्री, मोसंबी, केळीचे मोठे नुकसान झाले. अपेक्षेवर निसर्गाने पाणी फिरविले.तुटपुंजे अनुदान कुचकामी ठरले. नुकसानीचे पंचनामे करताना योग्य पद्धतीने झाले नाहीत. अशा तक्रारीचा ओघ गावागावांतून सुरू झाला. खरीप व रबीतील अनुभव सुखद नसतानाही शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने २०१४ च्या खरीप हंगामाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली परंतु मान्सून अद्याप पोहोचला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील वर्षीचा कटू अनुभव बाजूला सारत श्ेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पांढरे सोने जमिनीत टाकले. मोठ्या आशेने लागवड केलेल्या कापसाची मशागत करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. भारनियमनाची कटकट, पावसाची उघडीप सरत आलेला जलसाठा आदीने शेतकरी चिंतेत आहे. काहींना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे निसर्ग पावसाकडे डोळे आशाळभूत नजरेने कोरडेठक पडले आहेत. वाखरड, वाखरडवाडी, जंगमवाडी, बिजेवाडी, बहाद्दरपुरा, फुलवळ, पिंपळ्याचीवाडी, मुंडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. कंधार शहर व परिसरात ११ जून रोजी २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. परंतु पेठवडज, कुरुळा, उस्माननगर, फुलवळ, बारुळ गावासह परिसराकडे अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे उन्हाळी कापसाला जगविण्याचा प्रश्न जिकिरीचा झाला असून शेतकऱ्यांना मान्सून दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.गत खरीप व रबी हंगामाला निसर्ग लहरीपणाचा फटका बसला. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले. बी-बियाणाचा, सालगड्याचा,मशागतीचा खर्च निघणे अवघड झाले. नव्या आशेने अनेकांनी उन्हाळी कापसाची लागवड केली. परंतु निसर्गाला शेतकऱ्याची कीव यावी, अशीच अपेक्षा कंधार तालुक्यातील पिंपळ्याची वाडी येथील शेतकरी विठ्ठल मुंडे यांनी व्यक्त केली़ पहिल्याच पावसात जीवित हानी शेतकरी पावसाची प्रतीक्षेत असताना १३ जून रोजी पावसाच्या हजेरीपेक्षा विजांचा कडकडाट अधिक होता. गऊळ येथील एक व ब्रम्हवाडी येथील एकाचा वीज पडून मृत्यू झाला. गरीब कुटुंबावर निसर्गाने आघात केला. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मृत्यू पावलेल्या व जखमींना तात्काळ मदत देण्याची गरज आहे. प्रशासन याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे. १३ जून रोजी झालेला पाऊस उन्हाळी कापसाला अल्प ठरला. फुलवळ ३ मि.मी., कुरुळा-२ मि.मी, उस्माननगर-४०, बारुळ ३० व कंधार १२ मि.मी. झाला. पेठवडज पुन्हा निरंक राहिले.