शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
4
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
5
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
6
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
7
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
8
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
9
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
10
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
11
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
12
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
13
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
14
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
15
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
16
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
17
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
18
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
19
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
20
KL Rahul Captain, IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?

हमालांचा संप; अडत बाजार ठप्प !

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे लातूरच्या आडत बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. यापूर्वी ३१ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हमाल, मापाडी, गाडीवानांनी बंद पुकारला होता.लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली तुटपुंजी असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ही हमाली वाढवून मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून माथाडी कामगार संघटना आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. याबाबत व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेसोबत बैठकाही घेण्यात आल्या. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा प्रश्न अद्यापि प्रलंबित आहे. एक महिन्यापूर्वी बाजार समितीतील जवळपास तीन हजार कामगारांनी आठ दिवसांचे काम बंद आंदोलन केले होते. यातून तिढा सोडविण्यासाठी दोन वेळा बाजार समिती, व्यापारी आणि कामगारांमध्ये बैठका झाल्या. चर्चाही झाली. मात्र व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मजुरी दरवाढीला सहमती न दिल्यामुळे हा प्रश्न सुटला नाही. पुन्हा मंगळवारपासून माथाडी व हमाल, मापाडी, गाडीवान कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास तीन हजार हमाल, मापाडी, गाडीवान काम करतात. सध्या महागाईचे दिवस आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या मजुरीत हे कामगार काम करतात. वाढत्या महागाईबरोबर आपल्या मजुरीचा दरही वाढवावा, ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघर्ष करीत आहेत. अद्याप या संघर्षाला यश मिळाले नाही. पुन्हा पुन्हा आंदोलन पुकारावे लागत आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर आणि उलाढालीवर परिणाम होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे हमाल, मापाडी, गाडीवानांना व्यापाऱ्यांकडून मिळणारी मजुरी अल्प आहे. या मजुरीमध्ये सध्याच्या महागाईनुसार वाढ झाली पाहिजे. एवढ्या कमी हमालीमध्ये बाजार समितीत काम करणारे जवळपास तीन हजार कामगार आहेत. अल्प हमालीवर त्यांना उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. या हमालीच्या दरवाढीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कांबळे, शिवाजी कांबळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)