शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

हमालांचा संप; अडत बाजार ठप्प !

By admin | Updated: May 2, 2017 23:47 IST

लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे लातूरच्या आडत बाजारातील उलाढाल ठप्प झाली आहे. यापूर्वी ३१ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत हमाल, मापाडी, गाडीवानांनी बंद पुकारला होता.लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली तुटपुंजी असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. ही हमाली वाढवून मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून माथाडी कामगार संघटना आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. याबाबत व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेसोबत बैठकाही घेण्यात आल्या. मात्र व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हा प्रश्न अद्यापि प्रलंबित आहे. एक महिन्यापूर्वी बाजार समितीतील जवळपास तीन हजार कामगारांनी आठ दिवसांचे काम बंद आंदोलन केले होते. यातून तिढा सोडविण्यासाठी दोन वेळा बाजार समिती, व्यापारी आणि कामगारांमध्ये बैठका झाल्या. चर्चाही झाली. मात्र व्यापाऱ्यांनी कामगारांच्या मजुरी दरवाढीला सहमती न दिल्यामुळे हा प्रश्न सुटला नाही. पुन्हा मंगळवारपासून माथाडी व हमाल, मापाडी, गाडीवान कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास तीन हजार हमाल, मापाडी, गाडीवान काम करतात. सध्या महागाईचे दिवस आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्या मजुरीत हे कामगार काम करतात. वाढत्या महागाईबरोबर आपल्या मजुरीचा दरही वाढवावा, ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून कामगार संघर्ष करीत आहेत. अद्याप या संघर्षाला यश मिळाले नाही. पुन्हा पुन्हा आंदोलन पुकारावे लागत आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहारावर आणि उलाढालीवर परिणाम होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे हमाल, मापाडी, गाडीवानांना व्यापाऱ्यांकडून मिळणारी मजुरी अल्प आहे. या मजुरीमध्ये सध्याच्या महागाईनुसार वाढ झाली पाहिजे. एवढ्या कमी हमालीमध्ये बाजार समितीत काम करणारे जवळपास तीन हजार कामगार आहेत. अल्प हमालीवर त्यांना उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. या हमालीच्या दरवाढीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे व्यापाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा कांबळे, शिवाजी कांबळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)