शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

माणसं मरताहेत ? आम्हाला काय...; पडेगाव रोडबाबत सारेच गप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:49 IST

या अरुंद रस्त्यावर माणसांचे मृत्यू होत असताना बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वजण गप्पच आहेत. 

ठळक मुद्दे वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रोडला मृत्यूचा सापळा म्हटले जायचे. आता पडेगाव रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा दुपटीने जखमी झाले.

औरंगाबाद : वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रोडला मृत्यूचा सापळा म्हटले जायचे. आता पडेगाव रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. वर्षभरात दहा ते बारा लोकांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा दुपटीने जखमी झाले. या अरुंद रस्त्यावर माणसांचे मृत्यू होत असताना बांधकाम विभाग, महापालिका, वाहतूक पोलीस आणि विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्वजण गप्पच आहेत. 

अहमदनगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी मागील वीस वर्षांपासून होत आहे. या वीस वर्षांच्या काळात पडेगाव परिसरात वसाहती वाढल्या. शाळा, हॉटेल आणि इतर व्यवसायही वाढले. रस्त्यावरील वाहनांची संख्याही वीस वर्षांत दहा पटीने अधिक झाली. मात्र, हा रस्ता रुंद न झाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. 

गेल्या तीन वर्षांत नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट या दरम्यानच्या रस्त्यावर सुमारे ७० बळी गेले आहेत. यामधील बहुतांश बळी हे दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, महापालिका आणि लोकप्रतिनिधी सारेच गप्प असल्याने या मृत्यूच्या सापळ्यातून नागरिकांची सुटका होणार नाही, असेच चित्र आहे. 

२०१४ साली या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या विषयाकडे बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्षच केले, तर हा विषय राजकीय नेत्यांच्या चर्चेतही येत नाही, इतके त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने हॉटेलची संख्या वाढल्याने रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. वाहतूक पोलीस ही वाहने हटविताना दिसत नाही. 

पर्यायी रस्त्यांची कामे कधी?नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंटपर्यंतच्या रस्त्याला पर्यायी असे दोन रस्ते  विकास आराखड्यात आहेत. एका रस्त्याचे ९० टक्के भूसंपादन झालेले आहे. भूसंपादन झालेल्या रस्त्यावर मनपाने कच्चा रस्ता जरी तयार केला तरी निम्मी वाहतूक त्या रस्त्यावर वळेल. वैजापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाणार्‍या या रस्त्यांची कामे लवकरात लवकर झाल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होऊन अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादTrafficवाहतूक कोंडीMuncipal Corporationनगर पालिका