शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला 'कात्रज'चा घाट; १० वर्षांत खर्च गेला २ हजारांवरून ५५०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 14:24 IST

घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देडीपीआरचे काम अजून संपेनाकामाला लागणार सहा वर्षेपाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळली

- विकास राऊतऔरंगाबाद : नॅशनल हायवे क्रमांक २११ वरील औरंगाबाद ते धुळे मार्गावर कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम १० वर्षांपासून रखडलेले आहे. २ हजार कोटींवरून ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला असून आजवर प्रत्येक वेळी खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआय मुख्यालयाने घातला आहे. बोगद्याचे काम जेव्हा सुरू होईल, तेथून पुढे सहा वर्षे कामाला लागणार आहेत.

२०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे औट्रम घाटासह हस्तांतरित झाला. १० वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर ऑडिट किंवा सुरक्षा पाहणी झालेली नाही. त्यामुळे घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून, मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.सुरुवातीला १५ पैकी ११.५ किमी., नंतर ७ किमी अंतरात बोगद्याचे काम करण्याचे ठरले. सुमारे साडेचार कि.मी. अंतराचे काम मृळ डीपीआरमधून कमी करून ५०० कोटींचा खर्चही कमी केला. आता पुन्हा खर्च कपातीचा घाट घालण्यात आला आहे. कामातील विलंबामुळे सुरुवातीला २ हजार, नंतर ३५०० कोटींवरून सध्या ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला आहे.

१४ हजार मीटर डोंगर कधी फोडणारमशीनच्या साहाय्याने १४ हजार मीटर डोंगर फोडावा लागणार आहे, काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रीसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याच्या कामांचा प्रस्तावात समावेश आहे. पूर्वीच्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. नंतर १४ हजार मीटर डोंगर कापावा लागेल, असे ठरले. आता पुन्हा डीपीआरचे काम सुरू केले आहे.

पाच वर्षांत पाच वेळा दरड कोसळलीकन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ११ कि.मी.चा औट्रमघाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्या घाटाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून रोज १२ हजारांहून अधिक वाहनांचा राबता तेथून होत आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाण दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले. कन्नड तालुक्यातील सातपैकी तीन मंडळात १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस ३१ ऑगस्ट रोजी झाल्याने दरडी कोसळून वाहनांवर पडल्या.

प्रकल्प संचालकांची माहिती अशीनॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक अरविंद काळे यांंनी सांगितले, औट्रम डीपीआरचे काम सुरू आहे. ५५०० कोटींचा अंदाजित खर्च आहे. त्यात कपात करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. साधारणत: ३०० कोटी प्रति किमी.चा खर्च बोगद्याला लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : घाट पाच दिवसांसाठी बंदजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औट्रम घाटात भेट देत घाटातील तपासणी नाका खुला करण्याचे आदेश दिले. घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, औट्रमघाट सुमारे पाच दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार आहे. नांदगावमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मलबा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, असे प्रकल्प संचालक काळे यांनी सांगितले.

टॅग्स :fundsनिधीAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग