शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

By बापू सोळुंके | Updated: November 29, 2023 19:04 IST

सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजावर कोणी कितीही जळाले तरी मराठा समाजाची आरक्षणाची लढाई सुरूच राहणार आणि आम्हाला हे आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.अशक्तपणा जाणवत असल्यामुळे तीन दिवसापासून येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यावेळी त्यांनी मी शेतकऱ्यांत जात बघणार नाही.अवकाळी पावसाने शेतीच खूप नुकसान झालं,सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही सरकारने केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला , जरांगे पाटील म्हणाले की, सत्तर वर्ष आरक्षणाची वाट पाहिल्यानंतरही समाज बांधवांनी आरक्षणाची आशा मावळली होती मात्र आता 32 हजार लोकांना आरक्षण मिळाल्याने ते उत्साहाने फुलांची उधळण करून स्वागत करत असतात. मी त्यांना बुलडोझरने फुलांची उधळण करू नका असे सांगतो,पण समाज माझ ऐकत नाही असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, लोक कितीही जळले तरी काही फरक पडत नाही.जे स्वतःच्या मुलासाठी राजकारण करतात त्यांच्यावर कोण फुल उधळणार? त्यांच्यावर कुणी फुल उधळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मराठा आरक्षणासाठी सबुरीचा सल्ला दिला याकडे त्यांचे लक्ष वेधले असतात जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही टिकणार दिलं किंवा आरक्षण टिकवलं त्यापेक्षा आमचं ओबीसीतील आरक्षण आम्हाला द्या. आम्हाला सबुरीचा सल्ला देण्यापेक्षा तुमच्या लोकांना थांबवा मग आम्ही सबुरीने घेऊ, असेही जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही भुजबळ यांचा राजीनामा मागणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मराठा समाजाला रोज ओबीसीमधून आरक्षण मिळत आहे.मात्र मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला काळीज लागत. भावना नीट नसलेल्यांना सल्ले देत नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस