शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

अवकाळीने शेतीचे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना भरघोस नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी

By बापू सोळुंके | Updated: November 29, 2023 19:04 IST

सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजावर कोणी कितीही जळाले तरी मराठा समाजाची आरक्षणाची लढाई सुरूच राहणार आणि आम्हाला हे आरक्षण मिळणारच असा ठाम विश्वास मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.अशक्तपणा जाणवत असल्यामुळे तीन दिवसापासून येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ठणठणीत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यावेळी त्यांनी मी शेतकऱ्यांत जात बघणार नाही.अवकाळी पावसाने शेतीच खूप नुकसान झालं,सरकारने तत्काळ पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही सरकारने केली.

यावेळी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला , जरांगे पाटील म्हणाले की, सत्तर वर्ष आरक्षणाची वाट पाहिल्यानंतरही समाज बांधवांनी आरक्षणाची आशा मावळली होती मात्र आता 32 हजार लोकांना आरक्षण मिळाल्याने ते उत्साहाने फुलांची उधळण करून स्वागत करत असतात. मी त्यांना बुलडोझरने फुलांची उधळण करू नका असे सांगतो,पण समाज माझ ऐकत नाही असे त्यांनी सांगितले. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, लोक कितीही जळले तरी काही फरक पडत नाही.जे स्वतःच्या मुलासाठी राजकारण करतात त्यांच्यावर कोण फुल उधळणार? त्यांच्यावर कुणी फुल उधळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मराठा आरक्षणासाठी सबुरीचा सल्ला दिला याकडे त्यांचे लक्ष वेधले असतात जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही टिकणार दिलं किंवा आरक्षण टिकवलं त्यापेक्षा आमचं ओबीसीतील आरक्षण आम्हाला द्या. आम्हाला सबुरीचा सल्ला देण्यापेक्षा तुमच्या लोकांना थांबवा मग आम्ही सबुरीने घेऊ, असेही जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही भुजबळ यांचा राजीनामा मागणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, मराठा समाजाला रोज ओबीसीमधून आरक्षण मिळत आहे.मात्र मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला काळीज लागत. भावना नीट नसलेल्यांना सल्ले देत नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस