शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
4
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
5
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
6
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
7
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
8
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
9
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
10
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
11
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
12
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
13
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
14
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
15
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
16
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
17
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
18
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
19
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:23 IST

सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देहॅट्ट्रिक, ज्येष्ठता की सोशल इंजिनिअरिंगच्या आधारे देणार मंत्रीपदे

औरंगाबाद : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर सत्ता महायुतीचीच स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असले, तरी महायुतीचे अजून काही ठरलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून निवडून आलेल्या महायुतीच्या शिलेदारांपैकी कुणाचा क्रमांक मंत्रीमंडळात लागणार याबाबत, सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त चर्चाच सुरू आहेत. 

शिवसेनेच्या वाट्याला मंत्रीपद आले तर ते सहापैकी कुणाला देणार आणि भाजपच्या वाट्याला मंत्रिपद आले तर तिघांपैकी कुणाला देणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही पक्षातील सर्व इच्छुक मुंबईला रवाना झाले आहेत. 

सिल्लोडमधून आ. अब्दुल सत्तार यांनी विजय मिळविल्यामुळे पहिल्यांदाच तेथे सेनेचा विजय झाला आहे. शिवाय सेना सत्तार यांच्याकडे भविष्यातील साबीर शेख म्हणत पाहत असेल तर  त्यांच्या नावाचा विचार करू शकते. पैठणचे आ. संदीपान भुमरे हे शिवसेनेत सध्या सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा विचार पक्षाने केला नाही तर ते व त्यांचे समर्थक नाराज होतील. कन्नड आणि वैजापूरचे आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी काहीही संधी मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. औरंगाबाद मध्यचे आ. प्रदीप जैस्वाल यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. 

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणारे आ. संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेवर निवडून गेलेले आ. अंबादास दानवे यांचाही शिवसेनेकडून विचार होणे शक्य आहे; परंतु दानवे यांचीही या पदावर निवडून जाण्याची पहिलीच वेळ आहे; परंतु पक्षीय पातळीवर अनेक बाबींचा विचार केल्यानंतर मंत्रिमंडळातील समावेशाबाबत निर्णय होईल.

भाजपकडून कुणाला संधीभाजपच्या वाट्याला आलेल्या तीन मतदारसंघांपैकी औरंगाबाद पूर्वमधून आ. अतुल सावे हे मागच्या वेळी उद्योग राज्यमंत्री होते. नवीन सरकार स्थापनेत त्यांना बढती मिळते की, तेच खाते त्यांच्याकडे कायम राहते याबाबत अजून काही स्पष्टता नाही. विधानसभा अध्यक्षपदी फुलंब्रीतून निवडून आलेले आ. हरिभाऊ बागडे हेच कायम राहतील, असे बोलले जात आहे. गंगापूरमधून आ. प्रशांत बंब यांनीही हॅट्ट्रिक केली आहे. यावेळी भाजप श्रेष्ठी त्यांचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दरम्यान शिवसेनेचे जैस्वाल यांचा बायोडाटा शिवसेना भवन येथून मागविण्यात आला आहे, जैस्वाल सध्या मुंबईत आहेत. तर आ.भूमरे यांना देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची अपेक्षा आहे. आ.शिरसाट यांनी आपल्या परीने पक्षातील काही नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. परंतु इच्छुकांच्या इच्छा तेव्हाच पुर्ण होतील, जेव्हा महायुतीचे सरकार होण्यासाठी वाटाघाटी होतील. 

तीन सूत्रांचा विचार होणे शक्यपक्षातील ज्येष्ठतेनुसार भाजपमधून बागडे आणि सेनेचे भुमरे यांची नावे आहेत. हॅट्ट्रिक करण्यात आ. बंब आणि आ. शिरसाट यांची नावे आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा विचार केला, तर आ. सत्तार यांचे नावे पुढे येते. ज्येष्ठता, हॅट्ट्रिक, सोशल इंजिनिअरिंगच्या या सूत्रानुसार सरकार स्थापनेनंतर जिल्ह्यात एखादे कॅबिनेट आणि एखादे राज्यमंत्री पद मिळेल, अशी चर्चा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र