शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

१३५ दिवसात मनपा निवडणूक कशी घेणार? अद्याप नवीन प्रभाग आराखडाही निश्चित नाही 

By मुजीब देवणीकर | Updated: September 19, 2025 20:06 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे आयोग आणि राज्य सरकार संकटात सापडले आहे. पुढील १३५ दिवसांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा घेणार हा ‘सर्वोच्च’ प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही मागील ५ वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ४ महिन्यांत महापालिकेची निवडणूक होईल का? यावर अधिकाऱ्यांकडूनच साशंकता व्यक्त केली जात आहे.

२० एप्रिल २०२० पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत लोकप्रतिनिधी यावेत, असे मनापासून तर अजिबात वाटत नाही. निवडणुका घोषित होताच शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले बहुतांश अधिकारी महापालिका सोडून निघून जाण्याची दाट शक्यता आहे. कारण लोकप्रतिनिधींचा ‘सामना’हे अधिकारी करूच शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले. या आदेशानंतरही प्रशासनाकडून कोणतीही लगबग सुरू झालेली नाही. प्रारूप प्रभाग आराखडा घोषित झाला. त्यावर नियमांनुसार सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर आराखड्यातील त्रुटी दूर करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सुधारित आराखडा मनपा शासनाला सादर करेल.

ओबीसी विरुद्ध मराठासध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे राजकारण पेटलेले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेतल्या तर नुकसान होऊ शकते अशी सत्ताधारी महायुती सरकारला शंका येत आहे. त्यामुळे पुढील १३५ दिवसांत निवडणूका होतील किंवा नाही, यावर राजकीय मंडळींकडूनही साशंकता व्यक्त केली जात आहे.

‘सर्वोच्च’ आदेश कोणते?प्रभाग रचना तसेच आरक्षण टाकण्याची कारवाई ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी पूर्ण करावी, निवडणुकांसाठी आवश्यक ईव्हीएम मशीन ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी उपलब्ध करून घ्याव्यात, त्याचा अनुपालन अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

निवडणूक न घेण्यासाठीची कारणेराज्य निवडणूक आयोगाकडे पुरेसा अधिकारी वर्ग उपलब्ध नाही; ईव्हीएम मशीन नाहीत; केवळ ६५००० ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षा व सणासुदीचे दिवस आहेत. मतदार यादी अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात प्रभाग रचना व आरक्षणासंदर्भात याचिका प्रलंबित आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर