शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशन कसे होणार पूर्ण? अभियंत्यांच्या टंचाईमुळे झेडपीचा पाणीपुरवठा विभाग हतबल

By विजय सरवदे | Updated: July 25, 2023 17:57 IST

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

छत्रपती संभाजीनगर : अत्यावश्यक सेवा देणारा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग हा पुरेशा अभियंत्यांअभावी अपंग बनला आहे. १२४१ गावांसाठी जलजीवन मिशनच्या ११६१ योजनांसह डझनभर कामांचे नियंत्रण करताना या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून जे १५ कंत्राटी कनिष्ठ अभियंते होते त्यांच्याही सेवा शासन आदेशानुसार नुकत्याच खंडित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनांचे नियोजन कसे करावे, असा पेच या विभागासमोर निर्माण झाला आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. नियमानुसार १० कोटींच्या कामासाठी एक कनिष्ठ अभियंता याप्रमाणे ‘मिशन’ अंतर्गत ६६७ कोटींच्या कामासाठी ६७ अभियंत्यांची गरज आहे. मात्र, या विभागाकडे सध्या फक्त २१ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा कसा करावा, असा प्रश्न या विभागाला सतावतोय. एवढेच नाही, तर ग्रामीण जनतेला नियमित पाणी देणे, गावोगावचे सर्वेक्षण करणे, पाणी योजनांचा आराखडा तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, योजनांच्या कामकाजावर देखरेख करणे, आमदार, खासदार निधीतून पाण्याच्या योजना करणे, टंचाई आराखडा व त्याची अंमलबजावणी या व इतर कामांच्या नियोजनाचा भारही या विभागावरच आहे.या विभागास ५८ अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ३७ पदे रिक्त आहेत. या विभागाकडे नियमित १२ कनिष्ठ अभियंते कार्यरत असून अलीकडेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ९ सहायक अभियंत्यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती मिळाली. त्यांना आता पाणीपुरवठा विभागात नियुक्त करण्यात आले आहे. अशा एकूण २१ कनिष्ठ अभियंत्यांनाच जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याची जबाबदारी पेलावी लागत आहे.

शासनाकडे अभियंत्यांच्या पदाची मागणीपाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जलजीवन मिशनच्या कामांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था नेमलेली आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त कंत्राटी अभियंत्यांची सेवा खंडित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठ दिवसांपूर्वीच १५ अभियंत्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. मात्र, या सल्लागार संस्थेकडे तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंतेच नाहीत. त्यामुळे अडचण आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद