शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

जलजीवन मिशन कसे होणार पूर्ण? अभियंत्यांच्या टंचाईमुळे झेडपीचा पाणीपुरवठा विभाग हतबल

By विजय सरवदे | Updated: July 25, 2023 17:57 IST

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

छत्रपती संभाजीनगर : अत्यावश्यक सेवा देणारा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग हा पुरेशा अभियंत्यांअभावी अपंग बनला आहे. १२४१ गावांसाठी जलजीवन मिशनच्या ११६१ योजनांसह डझनभर कामांचे नियंत्रण करताना या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून जे १५ कंत्राटी कनिष्ठ अभियंते होते त्यांच्याही सेवा शासन आदेशानुसार नुकत्याच खंडित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनांचे नियोजन कसे करावे, असा पेच या विभागासमोर निर्माण झाला आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. नियमानुसार १० कोटींच्या कामासाठी एक कनिष्ठ अभियंता याप्रमाणे ‘मिशन’ अंतर्गत ६६७ कोटींच्या कामासाठी ६७ अभियंत्यांची गरज आहे. मात्र, या विभागाकडे सध्या फक्त २१ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा कसा करावा, असा प्रश्न या विभागाला सतावतोय. एवढेच नाही, तर ग्रामीण जनतेला नियमित पाणी देणे, गावोगावचे सर्वेक्षण करणे, पाणी योजनांचा आराखडा तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, योजनांच्या कामकाजावर देखरेख करणे, आमदार, खासदार निधीतून पाण्याच्या योजना करणे, टंचाई आराखडा व त्याची अंमलबजावणी या व इतर कामांच्या नियोजनाचा भारही या विभागावरच आहे.या विभागास ५८ अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ३७ पदे रिक्त आहेत. या विभागाकडे नियमित १२ कनिष्ठ अभियंते कार्यरत असून अलीकडेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ९ सहायक अभियंत्यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती मिळाली. त्यांना आता पाणीपुरवठा विभागात नियुक्त करण्यात आले आहे. अशा एकूण २१ कनिष्ठ अभियंत्यांनाच जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याची जबाबदारी पेलावी लागत आहे.

शासनाकडे अभियंत्यांच्या पदाची मागणीपाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जलजीवन मिशनच्या कामांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था नेमलेली आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त कंत्राटी अभियंत्यांची सेवा खंडित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठ दिवसांपूर्वीच १५ अभियंत्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. मात्र, या सल्लागार संस्थेकडे तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंतेच नाहीत. त्यामुळे अडचण आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद