शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशन कसे होणार पूर्ण? अभियंत्यांच्या टंचाईमुळे झेडपीचा पाणीपुरवठा विभाग हतबल

By विजय सरवदे | Updated: July 25, 2023 17:57 IST

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

छत्रपती संभाजीनगर : अत्यावश्यक सेवा देणारा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग हा पुरेशा अभियंत्यांअभावी अपंग बनला आहे. १२४१ गावांसाठी जलजीवन मिशनच्या ११६१ योजनांसह डझनभर कामांचे नियंत्रण करताना या विभागाला तारेवरची कसरत करावी लागत असून जे १५ कंत्राटी कनिष्ठ अभियंते होते त्यांच्याही सेवा शासन आदेशानुसार नुकत्याच खंडित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजनांचे नियोजन कसे करावे, असा पेच या विभागासमोर निर्माण झाला आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशनच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. नियमानुसार १० कोटींच्या कामासाठी एक कनिष्ठ अभियंता याप्रमाणे ‘मिशन’ अंतर्गत ६६७ कोटींच्या कामासाठी ६७ अभियंत्यांची गरज आहे. मात्र, या विभागाकडे सध्या फक्त २१ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा कसा करावा, असा प्रश्न या विभागाला सतावतोय. एवढेच नाही, तर ग्रामीण जनतेला नियमित पाणी देणे, गावोगावचे सर्वेक्षण करणे, पाणी योजनांचा आराखडा तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, योजनांच्या कामकाजावर देखरेख करणे, आमदार, खासदार निधीतून पाण्याच्या योजना करणे, टंचाई आराखडा व त्याची अंमलबजावणी या व इतर कामांच्या नियोजनाचा भारही या विभागावरच आहे.या विभागास ५८ अभियंत्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ३७ पदे रिक्त आहेत. या विभागाकडे नियमित १२ कनिष्ठ अभियंते कार्यरत असून अलीकडेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील ९ सहायक अभियंत्यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती मिळाली. त्यांना आता पाणीपुरवठा विभागात नियुक्त करण्यात आले आहे. अशा एकूण २१ कनिष्ठ अभियंत्यांनाच जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याची जबाबदारी पेलावी लागत आहे.

शासनाकडे अभियंत्यांच्या पदाची मागणीपाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जलजीवन मिशनच्या कामांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था नेमलेली आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त कंत्राटी अभियंत्यांची सेवा खंडित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आठ दिवसांपूर्वीच १५ अभियंत्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. मात्र, या सल्लागार संस्थेकडे तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंतेच नाहीत. त्यामुळे अडचण आहे.- अजित वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जि. प.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद